शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

साहित्य महामंडळ अन‌् सरहदमध्ये रंगला कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:09 IST

शुक्रवारी महामंडळाच्या बैठकीत नाशिकच्या निमंत्रणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचवेळी संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. ...

शुक्रवारी महामंडळाच्या बैठकीत नाशिकच्या निमंत्रणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचवेळी संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीचा आदर करुन दिल्लीकरांची तयारी असल्यास एक ‘विशेष’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करेल, असे संजय नहार यांना सुचवण्यात आले होते. हे संमेलन १ मेला घेण्याची तयारी दर्शवण्यात आली. मात्र, नहार यांनी महामंडळाचा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष संमेलनाची संधी हुकली, असे महामंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत नहार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास स्वागताध्यक्ष करुन दिल्लीत संमेलन घेण्याचा प्रस्ताव आम्ही ठाले-पाटील यांच्यापुढे ठेवला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत एकही संमेलन झालेले नाही. त्यामुळे सरहदतर्फे पुढाकार घेण्यात आला होता. मात्र, अध्यक्षांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. संमेलन दिल्लीला की नाशिकला हा वाद कधीच नव्हता, तर दिल्लीबाबत घेतल्या जाणा-या हरकतींबाबत होता. नाशिकमध्येही साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडेल, अशी खात्री वाटते.’

------------

महामंडळाच्या घटनेमध्ये विशेष संमेलन घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार सरहदला विशेष संमेलनाचा प्रस्ताव देण्यात आला होता. यापूर्वी अंदमानलाही विशेष संमेलन झाले होते. संमेलनासाठी अनेक संस्था प्रयत्न करत असतात. मात्र, सार्वजनिक संस्थामध्ये काम करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते.

- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

----------------------

सरहद संस्थेने यापूर्वी घुमानचे संमेलन यशस्वीरित्या पार पाडले. मात्र, नाशिकलाच संमेलन घ्यायचे हे आधीच ठरल्याप्रमाणे सर्व हालचाली झाल्या. आमच्या सरळ, स्पष्ट आणि सदहेतूबद्दल शंका घेण्याचा प्रकार नक्कीच ‘कौतुकास्पद’ नाही.

- संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था