शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

‘रमजान’मध्ये गरजूंचा आधार व्हावे

By admin | Updated: May 29, 2017 01:37 IST

इंडोनेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात ‘रमजान’च्या महिन्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गरजूंना समुपदेशन व मानसिक

इंडोनेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात ‘रमजान’च्या महिन्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गरजूंना समुपदेशन व मानसिक आधार देणे हे शक्य होत असेल; तर मग आपल्या देशात का होऊ नये? असा सवाल इस्लाम धर्माचे अभ्यासक अस्लम जमादार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उपस्थित केला. तसेच आपल्या शेजारील कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती भुकेली राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येक मुस्लिम बांधव त्याच्या मदतीसाठी सरसावेल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘रमजान’ साजरा होईल, असे त्यांनी नमूद केले.मुस्लिमांच्या पवित्र ‘रमजान’ महिन्याला रविवारी सुरुवात झाली आहे. रमजान म्हणजे उपासना, कृतज्ञता, आनंद आणि आभार प्रदर्शनाचाच महिना म्हणून गणला जातो, असे नमूद करून जमादार म्हणाले, इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शुद्धता, समर्पण व आज्ञापालन असा आहे. इस्लाम म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण व ईश्वराची आज्ञापालन होय. जो कोणी जीवनाच्या प्रत्येक पैलूचे इस्लामच्या शिकवणुकीनुसार पालन करील तोच खरा ‘मुस्लिम’ आहे.जमादार म्हणाले, ‘रमजान’ महिन्यात पवित्र ग्रंथ कुराण उतरविण्याचे व आदेशांना ग्रथित करण्याचे काम झाले आहे. म्हणूनच या महिन्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. तसेच ईश्वराचे नामस्मरण करावे आणि उपवास (रोजा) संपूर्ण महिनाभर करण्यात मुस्लिम बांधव तल्लीन होऊन जातात.रोजा म्हणजे केवळ उपाशी राहून चालत नाही. या संबंधी प्रेषित मुहम्मद पैगंबर (स.) यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायांचा रोजा, कानाचा रोजा आहे. रोजा ठेवणाऱ्या डोळ्यांनी वाईट पाहू नये. हाताने वाईट काही करू नये, त्याची पाऊले वाईट मार्गाकडे वळू नयेत, कानांनी वाईट काही ऐकू नये. कोणाशी भांडू नये. कोणी भांडायला आल्यास त्यांना नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. या एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणाऱ्या व्यक्तीस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते, की समाजासाठी ती व्यक्ती उपयोगी होऊन जाते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तीची निर्मिती व्हावी, त्यातून एक आदर्श समाजाची रचना होईल; हाच त्यामागील उद्देश दिसून येतो. परंतु, दुर्दैवाने असभ्यतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. खोटेपणा, विश्वासघात, फसवणूक ही मोठ्या स्तरावर पोहोचू लागली आहे. अहंकार, लोभीपणा, स्वार्थ, यांनी थैमान मांडले आहे.मुस्लिम समाजातील व्यक्तीने सत्य, चांगुलपणाची नीतिमूल्ये आचरणात आणताना कुराणचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे.‘रमजान’ म्हणजे भल्या पहाटे उठणे, जेवणे, इफ्तार पार्टीच्या माध्यमातून अन्नपदार्थ खाणे असे बहुतेकांचे समीकरण होऊ लागले आहे. मुस्लिम समाजातील धार्मिक संस्थेतील, मदरसे, मशिदीमधून मुल्ला-मौलवी सातत्याने आपल्या प्रवचनाताून प्रबोधन करत असले तरी शेजारील गरीब, गरजू निराधार पीडितांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक, मानसिक मदत करण्यात मोठे यश मिळालेले नाही.‘जकात’ ही संकल्पना खरे तर गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी दूर करण्यासाठी निर्मित केली गेली, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजातील विचारवंत, अभ्यासक, धार्मिक नेत्यांनी एकत्र येऊन ही सकंल्पना युवा पिढीला हाताशी घेऊन कार्यान्वित केली तर आर्थिक मदतच नव्हे तर रोजगारसुद्धा उपलब्ध होऊ शकेल. काही मशिदींच्या समोर बुरखेधारी घटस्फोटित, विधवा महिला आपल्या लेकरांना बरोबर घेऊन मदतीच्या अपेक्षेने उभ्या असतात. ही स्थिती बदलून या महिला  स्वत:च्या पायावर उभ्या राहण्याची गरज आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.‘ईद’च्या दिवशी व संपूर्ण रमजान महिन्यात इतर जातीधर्मातील किमान पाच व्यक्तींशी मैत्रीनाते संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी  स्नेह प्रस्थापित करणे हाच अलीकडील काळातील ‘रमजान’चा संदेश आहे, असे म्हटल्यास  चुकीचे ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.