शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राजगुरुनगरला महामार्ग केला मोकळा, प्रांताधिका-यांची धडाकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:41 IST

राजगुरुनगर : पुणे-नाशिक या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि.२६) धडक कारवाई करण्यात आली.

राजगुरुनगर : पुणे-नाशिक या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी (दि.२६) धडक कारवाई करण्यात आली. नगर परिषद, महसूल व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबवून अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.राजगुरुनगर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले होते. यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक, प्रवाशी करीत होते. अतिक्रमणे, अरुंद पूल यामुळे नेहमीच वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे राजगुरुनगरमधून प्रवास म्हणजे नको रे बाबा! अशीच भावना झाली होती.गुरुवारी सकाळी सहापासूनच प्रशासनाने उपविभागीय अधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद यांच्या नेत्तृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात आली. महामार्गावरील खेड पोलीस स्टेशन ते थिगळस्थळपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढून टाकले. तसेच पाबळ चौकातील अतिक्रमणेहीहटवविण्यात आली. यामध्ये पत्राचे शेड, दुकानांचे लावलेले जाहिरातींचे फलक, हातगाड्या, पानटपºया, वडापावच्या हातगाड्या जेसीबी यंत्राद्वारे काढून टाकल्या. ही कारवाई नगर परिषदेच्या आदेशान्वये केली. अतिक्रमण करणाºयांना दोन दिवसांपूर्वीच नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच गावात भोंगारिक्षा फिरवून दवंडीही देण्यात आली होती. स्वत: अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते. अतिक्रमणांमुळे बसस्थानकाहून महामार्गावर येत असताना डावीकडून येणारे वाहन दिसत नव्हते. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या कारवाईमुळे एसटी बसस्थानकात लगत असलेले हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लांबून दिसू लागले आहेत. पाबळ चौकातील एसटी बसस्थानकांची सुरक्षा भिंतही दिसू लागली आहे. हा रस्ता आता कुठे मोकळा श्वास घेत आहे. चहाटपरी, पानटपरी, वडापाव, फळविक्रते या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे.आज सकाळपासूनच ३० ते ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दिवसभर कारवाई सुरू होती.यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार राजेश कानसकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता भास्कर क्षीरसागर यांच्यासह या कारवाईत ६ वरिष्ठ अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, दोन दंगाकाबू पथके, नगर परिषद कर्मचारी सहभागी झाले होते.उदरनिवार्हाचा प्रश्न, पर्यायी व्यवस्था कराप्रशासनाने तर अतिक्रमणे हटवली. त्यामुळे शहरातील शेकडो कुटुंबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्गावरील रस्त्यावर विक्री करणारे फळविक्रे ते, पानविक्रेते, चप्पल-बुट विक्रेते, चहाविक्रेते, वडापावविक्रेते आणि इतर अनेक छोटे-छोटे व्यवसायीक रस्त्यावर आले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढले असले तरी अतिक्रमणधारकांना नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रीया विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. १५ दिवसांपूर्वी आयुष प्रसाद यांनी खेड विभाग येथे उपविभागीय पदावर रुजू झाले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी कामाचा धडाका सुरू केला असल्यामुळे तालुक्याला एक तरुण,खमका, निर्भीड, ‘सिंघम’ अधिकारी मिळाला असल्यामुळे राजगुरुनगर शहरातील नागरिक आयुष प्रसाद यांचे कौतुक करीत आहेत.पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व अतिक्रमण काढून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजकटाकून काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येणार आहे. रस्ता प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून वाहतूककोंडी होणार नाही, महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांना, पादचारी तसेच शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. उद्या (दि.२७) वाडा रोडवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. - आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारीतथा प्रांताधिकारी, खेड विभाग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा