शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राजाभाऊंनी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:08 IST

स्वातंत्र्यानंतर मराठी चित्रपट हा संगीत बारीकडे वळला. त्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे तमाशा, असे चित्र निर्माण झाले. मात्र, राजाभाऊ परांजपे यांनी मराठी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले

पुणे : स्वातंत्र्यानंतर मराठी चित्रपट हा संगीत बारीकडे वळला. त्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे तमाशा, असे चित्र निर्माण झाले. मात्र, राजाभाऊ परांजपे यांनी मराठी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले. दिग्दर्शन, लेखन व अभिनयाने मराठी चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्या जीवनाचा व संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यांनी केले.राजाभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना बुधवारी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते म्हणाले, ‘‘राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी चित्रपटाला तारले. राजाभाऊंचे कर्तृत्व मोठ्या कष्टात गेले. त्यांचे चित्रपट बारीक दृष्टिकोनातून बघताना त्यांनी किती मेहनत घेतली असेल, किती अभ्यास केला असेल, याची जाणीव होते. त्या काळी ‘पॉल म्युनी’सारख्या अभिनेत्याबरोबर राजाभाऊंची तुलना व्हायची. चित्रपटसृष्टी हा भूलभुलैया आहे असे म्हटले जाते. मात्र, तो भूलभुलैय्या नाही, तर चित्रपट माणसाचे संपूर्ण जीवन बदलून टाकतो हे राजाभाऊंच्या चित्रपटातून कळाले व माझ्याही जीवनात बदल झाला.’’ गोखले म्हणाले, ‘‘आजचा मिळालेला पुरस्कार हा सन्मानाचा असून तो मी जपून ठेवणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागचा हेतू काय, हे कसे महत्त्वाचे असते हे जाणून घ्यायचे असेल तर बिमल रॉय, राज कपूर यांचे जसे चित्रपट पाहिले जातात, तसेच राजाभाऊंचे चित्रपट बघणे हे नवीन दिग्दर्शकांचे काम आहे.’’ (प्रतिनिधी)