शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

राजाभाऊंनी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:08 IST

स्वातंत्र्यानंतर मराठी चित्रपट हा संगीत बारीकडे वळला. त्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे तमाशा, असे चित्र निर्माण झाले. मात्र, राजाभाऊ परांजपे यांनी मराठी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले

पुणे : स्वातंत्र्यानंतर मराठी चित्रपट हा संगीत बारीकडे वळला. त्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे तमाशा, असे चित्र निर्माण झाले. मात्र, राजाभाऊ परांजपे यांनी मराठी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले. दिग्दर्शन, लेखन व अभिनयाने मराठी चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्या जीवनाचा व संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यांनी केले.राजाभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना बुधवारी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते म्हणाले, ‘‘राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी चित्रपटाला तारले. राजाभाऊंचे कर्तृत्व मोठ्या कष्टात गेले. त्यांचे चित्रपट बारीक दृष्टिकोनातून बघताना त्यांनी किती मेहनत घेतली असेल, किती अभ्यास केला असेल, याची जाणीव होते. त्या काळी ‘पॉल म्युनी’सारख्या अभिनेत्याबरोबर राजाभाऊंची तुलना व्हायची. चित्रपटसृष्टी हा भूलभुलैया आहे असे म्हटले जाते. मात्र, तो भूलभुलैय्या नाही, तर चित्रपट माणसाचे संपूर्ण जीवन बदलून टाकतो हे राजाभाऊंच्या चित्रपटातून कळाले व माझ्याही जीवनात बदल झाला.’’ गोखले म्हणाले, ‘‘आजचा मिळालेला पुरस्कार हा सन्मानाचा असून तो मी जपून ठेवणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागचा हेतू काय, हे कसे महत्त्वाचे असते हे जाणून घ्यायचे असेल तर बिमल रॉय, राज कपूर यांचे जसे चित्रपट पाहिले जातात, तसेच राजाभाऊंचे चित्रपट बघणे हे नवीन दिग्दर्शकांचे काम आहे.’’ (प्रतिनिधी)