शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: July 28, 2014 05:37 IST

तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे.

भोर : तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे. भाटघर धरण ३९ टक्के भरले असून, नीरा देवघर ४७ टक्के भरले आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे ९१ टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी दोन्ही धरणे निम्मीच भरली आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर धरण भागात आज १३ मिमी पाऊस झाला, तर एकूण १०१८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण ४७ टक्केच भरले तर गतवर्षी १४८८ मिमी पाऊस होऊन धरण ९१ टक्के भरले होते.भाटघर धरण भागात आज २ मिमी पाऊस झाला, तर एकूण ३२० मिमी पाऊस होऊन धरणे ३९ टक्के भरले आहे. मागील वर्षी ९३७ मिमी पाऊस होऊन धरणे ९१ टक्के भरले होते. मागच्या तुलनेत या वेळी पाऊसही निम्माच असून, धरणे ही अर्धीच भरली आहेत. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास धरणे भरायला उशीर होणार आहे. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यावर पश्चिम भागातील शेतकरी भात व नाचणीच्या लावणीत मग्न आहेत. हिर्डोशी खोऱ्यात ५० टक्के लागवडी पूर्ण झाल्या आहेत, तर वीसगाव खोऱ्यात भाताची व कडधान्याची दुबार पेरणीमुळे उशिरा उगवण झाल्याने आता भातलागवडी सुरू झाल्या आहेत. यापुढे पाऊस कमी झाला तर लागवडी पूर्ण होऊ शकत नाहीत. पाणी कमी होत चालले आहे, असे माऊली शिंदे व हनुमंत म्हस्के या शेतकऱ्यांनी सांगितले. तर पूर्व भागात पावसाअभावी भातासह कडधान्याच्या पेरण्याच झाल्या नव्हत्या. सध्या कडधान्याची पेरणी सुरू आहे. भाताच्या तरव्यांची चांगली उगवण झाली नाही त्यामुळे व लागवडीला पाणी कमी आहे. यामुळे व भाताच्या लावण्या सुरू नाहीत. हा बागायती पट्टा असल्याने भातापेक्षा इतर पिकांना शेतकरी अधिक पसंती देतात. आंबवडे खोऱ्यातही भाताच्या उगवण उशिरा झाल्याने सध्या लागवडी सुरू आहेत. तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून, पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास डोंगरदऱ्यातील झरे आटतील व भातासह इतर पिके पाण्याआाावी खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यात दीड महिना खरिपाची उशिरा पेरणी व लागवडी सुरू आहेत. त्यातील ५० टक्के खराब झाले असून, पावसाअभावी पुढील पिकांचे काय होईल, याचा भरोसा देता येत नाही. यामुळे शेतकरी चिंता करीत आहेत. त्यामुळे अजून पावसाची गरज आहे, असे शेतकरी कुडपणे यांनी संगितले. (वार्ताहर)