शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: July 28, 2014 05:37 IST

तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे.

भोर : तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे. भाटघर धरण ३९ टक्के भरले असून, नीरा देवघर ४७ टक्के भरले आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे ९१ टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी दोन्ही धरणे निम्मीच भरली आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर धरण भागात आज १३ मिमी पाऊस झाला, तर एकूण १०१८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण ४७ टक्केच भरले तर गतवर्षी १४८८ मिमी पाऊस होऊन धरण ९१ टक्के भरले होते.भाटघर धरण भागात आज २ मिमी पाऊस झाला, तर एकूण ३२० मिमी पाऊस होऊन धरणे ३९ टक्के भरले आहे. मागील वर्षी ९३७ मिमी पाऊस होऊन धरणे ९१ टक्के भरले होते. मागच्या तुलनेत या वेळी पाऊसही निम्माच असून, धरणे ही अर्धीच भरली आहेत. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास धरणे भरायला उशीर होणार आहे. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यावर पश्चिम भागातील शेतकरी भात व नाचणीच्या लावणीत मग्न आहेत. हिर्डोशी खोऱ्यात ५० टक्के लागवडी पूर्ण झाल्या आहेत, तर वीसगाव खोऱ्यात भाताची व कडधान्याची दुबार पेरणीमुळे उशिरा उगवण झाल्याने आता भातलागवडी सुरू झाल्या आहेत. यापुढे पाऊस कमी झाला तर लागवडी पूर्ण होऊ शकत नाहीत. पाणी कमी होत चालले आहे, असे माऊली शिंदे व हनुमंत म्हस्के या शेतकऱ्यांनी सांगितले. तर पूर्व भागात पावसाअभावी भातासह कडधान्याच्या पेरण्याच झाल्या नव्हत्या. सध्या कडधान्याची पेरणी सुरू आहे. भाताच्या तरव्यांची चांगली उगवण झाली नाही त्यामुळे व लागवडीला पाणी कमी आहे. यामुळे व भाताच्या लावण्या सुरू नाहीत. हा बागायती पट्टा असल्याने भातापेक्षा इतर पिकांना शेतकरी अधिक पसंती देतात. आंबवडे खोऱ्यातही भाताच्या उगवण उशिरा झाल्याने सध्या लागवडी सुरू आहेत. तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून, पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास डोंगरदऱ्यातील झरे आटतील व भातासह इतर पिके पाण्याआाावी खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यात दीड महिना खरिपाची उशिरा पेरणी व लागवडी सुरू आहेत. त्यातील ५० टक्के खराब झाले असून, पावसाअभावी पुढील पिकांचे काय होईल, याचा भरोसा देता येत नाही. यामुळे शेतकरी चिंता करीत आहेत. त्यामुळे अजून पावसाची गरज आहे, असे शेतकरी कुडपणे यांनी संगितले. (वार्ताहर)