शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: July 28, 2014 05:37 IST

तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे.

भोर : तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे. भाटघर धरण ३९ टक्के भरले असून, नीरा देवघर ४७ टक्के भरले आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे ९१ टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी दोन्ही धरणे निम्मीच भरली आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर धरण भागात आज १३ मिमी पाऊस झाला, तर एकूण १०१८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण ४७ टक्केच भरले तर गतवर्षी १४८८ मिमी पाऊस होऊन धरण ९१ टक्के भरले होते.भाटघर धरण भागात आज २ मिमी पाऊस झाला, तर एकूण ३२० मिमी पाऊस होऊन धरणे ३९ टक्के भरले आहे. मागील वर्षी ९३७ मिमी पाऊस होऊन धरणे ९१ टक्के भरले होते. मागच्या तुलनेत या वेळी पाऊसही निम्माच असून, धरणे ही अर्धीच भरली आहेत. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास धरणे भरायला उशीर होणार आहे. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यावर पश्चिम भागातील शेतकरी भात व नाचणीच्या लावणीत मग्न आहेत. हिर्डोशी खोऱ्यात ५० टक्के लागवडी पूर्ण झाल्या आहेत, तर वीसगाव खोऱ्यात भाताची व कडधान्याची दुबार पेरणीमुळे उशिरा उगवण झाल्याने आता भातलागवडी सुरू झाल्या आहेत. यापुढे पाऊस कमी झाला तर लागवडी पूर्ण होऊ शकत नाहीत. पाणी कमी होत चालले आहे, असे माऊली शिंदे व हनुमंत म्हस्के या शेतकऱ्यांनी सांगितले. तर पूर्व भागात पावसाअभावी भातासह कडधान्याच्या पेरण्याच झाल्या नव्हत्या. सध्या कडधान्याची पेरणी सुरू आहे. भाताच्या तरव्यांची चांगली उगवण झाली नाही त्यामुळे व लागवडीला पाणी कमी आहे. यामुळे व भाताच्या लावण्या सुरू नाहीत. हा बागायती पट्टा असल्याने भातापेक्षा इतर पिकांना शेतकरी अधिक पसंती देतात. आंबवडे खोऱ्यातही भाताच्या उगवण उशिरा झाल्याने सध्या लागवडी सुरू आहेत. तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून, पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास डोंगरदऱ्यातील झरे आटतील व भातासह इतर पिके पाण्याआाावी खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यात दीड महिना खरिपाची उशिरा पेरणी व लागवडी सुरू आहेत. त्यातील ५० टक्के खराब झाले असून, पावसाअभावी पुढील पिकांचे काय होईल, याचा भरोसा देता येत नाही. यामुळे शेतकरी चिंता करीत आहेत. त्यामुळे अजून पावसाची गरज आहे, असे शेतकरी कुडपणे यांनी संगितले. (वार्ताहर)