शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या आहेत. जूनच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या आहेत. जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार केली होती. भाताची रोपे लावण्यासाठी भात खाचरात चिखलनी आदी कामे पावसाअभावी करता आली नाहीत. आवश्यक पाऊस नसल्याने भात रोपे पिवळी पडून वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे यांनी या भागात दौरा करून रोपांची पाहणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, केवाडीचे सरपंच अमोल लांडे, विठ्ठल बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर वीरणक, मारुती वारे आदींनी त्यांना भातशेतीच्या प्रतिकूल परिस्थितीची माहिती दिली.

आदिवासी शेतकऱ्याची वर्षभराची आर्थिक बेगमी भात पिकावर अवलंबून असते. हे पीक हातचे गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जर पाऊस झालाच नाही तर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे देवराम लांडे यांनी सांगितले.

फोटो : आदिवासी भागात पावसाअभावी पिवळी पडल्याने वाळू लागलेली भातरोपाची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, सोबत कृषी अधिकारी अमर फडतरे.