शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सूचना व तक्रारींचा पीएमपीवर पाऊस

By admin | Updated: February 7, 2015 23:54 IST

नवीन बसमार्ग सुरू करावा, महिलांसाठी स्वतंत्र बस असावी, बसची अवस्था सुधारावी, दरवाढ रद्द करावी, अशा सूचनांसह बस वेळेवर येत नाही,

बीड : जिल्हा परिषदेत चुकीची कामे करणाऱ्यांना माफी नाही, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी शनिवारी सीईओंना दिले. जि. प. मध्ये त्यांनी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्यांनी नियमबाह्य कामे करणाऱ्यांना धारेवर धरले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सीईओ नामदेव ननावरे, अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी यांची उपस्थिती होती. सहा महिन्यांपूर्र्वी अप्पर आयुक्त डॉ. जितेेंद्र पापळकर यांनी जि.प. ची झाडाझडती घेतली होती. त्यांनी शासनाला अहवाल दिला होता; पण स्थानिक पातळीवर कुठल्याच कारवाया झाल्या नाहीत. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अधिकार सीईओंना आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवू नये, असे दांगट म्हणाले. बेकायदेशीर कामांना अजिबात थारा दिला दिला जाणार नाही. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही;पण त्यांची गय करता कामा नये, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध बडगा उगारा असे आदेश त्यांनी सीईओ ननावरे यांना दिले. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने अधिकाऱ्यांनी गांंभिर्याने काम करावे. कुचराई न करता कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तत्पूर्वी अहवाल वाचन झाले. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मार्चपर्यंत पदोन्नत्या३१ मार्च २०१५ पर्यंत जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आयुक्त दांगट यांनी दिली. पदोन्नती प्रक्रिया राबविताना अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले. बिंदूनामावली, ज्येष्ठता यादी तपासूनच पदोन्नत्या द्याव्यात अन्यथा कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिली.देवगुडेंचे निवृत्तीवेतन रोखाशिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांना आयुक्तांनी भरबैठकीत आंतरजिल्हा बदल्या, पदोन्नत्यांत अनियमितता कशी काय झाली? असा प्रश्न केला. त्यांनी मी आताच चार्ज घेतल्याचे सांगून चेंडू दुसरीकडे टोलवला. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे यांचे निवृत्तीवेतन रोखा, असे आदेश दांगट यांनी दिले.शेंडे, इनामदारांची अडचणजि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता एन. ए. इनामदार यांनी मासिक अहवाल तयार केला नव्हता. अहवाल का तयार केला नाही? असा प्रश्न आयुक्त दांगट यांनी केला. त्यामुळे या दोघांची अडचण झाली. (प्रतिनिधी)आयुक्त दांगट यांनी जिल्हा परिषदेपाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.४ते म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात ३३३ गावांचा समावेश आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करावा.४तलावातील गाळ काढण्यासाठी नऊ यंत्रे उपलब्ध आहेत. त्याचेही नियोजन करावे, पाणलोट व्यवस्थापनाची कामे सुरू करण्यासही त्यांनी सांगितले.