शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाऊस भात, भुईमुगाला तारणार

By admin | Updated: September 11, 2015 04:39 IST

जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे

पुणे : जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी आज दिली.धुमाळ म्हणाले, ‘‘खरिपाला फारसा फायदा होणार नाही. खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. फक्त ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. सोयाबीनची लागवड अनेक पटींनी झाली होती. हे पीकही वाया गेले आहे. बाजरी काढणीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या पावसाचा भुईमूगपिकाला फायदा होऊ शकेल.’’भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने रोपांच्या वाढीसाठी फायदा होईल. भाताला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. खरिपापेक्षा रब्बीचा हंगाम मोठा असतो. या हंगामाच्या पूर्वमशागतींना वेग येऊन पेरण्या लवकर पूर्ण होऊ शकतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू दीर्घ काळानंतर सुरू झालेल्या पावसाने भीमा खोऱ्यातील सर्व २५ धरण प्रकल्पांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपर्यंत येडगाव धरणात सर्वाधिक ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचा धरणातील साठा वाढण्यासाठी मदत होणार आहे. पावसात सातत्य राहिल्यास रब्बी हंगाम समाधानकारक जाऊ शकेल.दोनच दिवस झालेल्या पावसामुळे दुष्काळाचे चित्र काहीसे पुसले जाऊ लागले आहे. सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वरसगावमध्ये ४५, टेमघरमध्ये २, पानशेत प्रकल्पात २४ व खडकवासला धरणात १३ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सिंचन भवनमधून सांगण्यात आले.भीमा उपखोऱ्यातील धरणांमध्ये २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : पिंपळगाव जोगे २२, माणिक डोह ७, येडगाव ५२, वडज १३, डिंभे २६, घोड २०, विसापूर १७, कळमोडी २७, चासकमान ३५, भामा ३५, वडीवळे ५०, आंद्रा ३२, कासारसाई २७, मुळशी ९, गुंजवणी २२, भाटघर १६, नीरा देवघर २, वीर ४२, नाझरे ३४, उजनी ७.