शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पाऊस भात, भुईमुगाला तारणार

By admin | Updated: September 11, 2015 04:39 IST

जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे

पुणे : जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी आज दिली.धुमाळ म्हणाले, ‘‘खरिपाला फारसा फायदा होणार नाही. खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. फक्त ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. सोयाबीनची लागवड अनेक पटींनी झाली होती. हे पीकही वाया गेले आहे. बाजरी काढणीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या पावसाचा भुईमूगपिकाला फायदा होऊ शकेल.’’भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने रोपांच्या वाढीसाठी फायदा होईल. भाताला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. खरिपापेक्षा रब्बीचा हंगाम मोठा असतो. या हंगामाच्या पूर्वमशागतींना वेग येऊन पेरण्या लवकर पूर्ण होऊ शकतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू दीर्घ काळानंतर सुरू झालेल्या पावसाने भीमा खोऱ्यातील सर्व २५ धरण प्रकल्पांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपर्यंत येडगाव धरणात सर्वाधिक ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचा धरणातील साठा वाढण्यासाठी मदत होणार आहे. पावसात सातत्य राहिल्यास रब्बी हंगाम समाधानकारक जाऊ शकेल.दोनच दिवस झालेल्या पावसामुळे दुष्काळाचे चित्र काहीसे पुसले जाऊ लागले आहे. सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वरसगावमध्ये ४५, टेमघरमध्ये २, पानशेत प्रकल्पात २४ व खडकवासला धरणात १३ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सिंचन भवनमधून सांगण्यात आले.भीमा उपखोऱ्यातील धरणांमध्ये २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : पिंपळगाव जोगे २२, माणिक डोह ७, येडगाव ५२, वडज १३, डिंभे २६, घोड २०, विसापूर १७, कळमोडी २७, चासकमान ३५, भामा ३५, वडीवळे ५०, आंद्रा ३२, कासारसाई २७, मुळशी ९, गुंजवणी २२, भाटघर १६, नीरा देवघर २, वीर ४२, नाझरे ३४, उजनी ७.