शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

नीरा : यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जून महिना संपला तरी ...

नीरा : यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जून महिना संपला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. काहींनी तर आगाप पेरणी केल्या. त्याच्या पिकांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊन दुबार पेरणीचे ‘संकट आ वासून’ आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आठ जून रोजी पहिले मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच शेतात पाळी घालणे, पिकांचे नियोजन करणे आदी कामांना सुरुवात केली. परंतु काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर संपूर्ण नक्षत्र कोरडे गेले. २१ जूनला दुसरे आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. कोल्हा हे या नक्षत्राचे वाहन असून या नक्षत्रानेही शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. तसेच अजूनही आठवडाभर पाऊस होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीने सर्वच पिकांच्या दुबार, तिबार पेरण्या करूनही पिके नष्ट झाली होती. परिणामी या वर्षीसाठी जादा दराने बियाणे खरेदी करण्यात आली आहेत. वाटाण्याचे दरही मागील वर्षीपेक्षा जास्त वाढले असून, भुईमूग बियाणे तब्बल २०० रुपयांवर गेले आहे. कांद्याचे बियाणे व इतर पिकांचे बियाणे जादा भावाने खरेदी करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाच्या भरवश्यावर पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, ते विहिरीचे पाणी देत आहेत. परंतु ज्यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही ते मात्र अद्यापही हातावर हात मांडून बसले आहेत.

राख येथील शेतकरी विनायक पवार यांनी पहिल्या दोन-तीन पावसांनंतर बाजरी पेरली. आता पावसाची नितांत गरज आहे. जमिनीत ओल आहे, पण मातीच्यावर तापमानत प्रचंड उष्णता असल्याने कोंब जळत आहेत. या दिवसात आभाळ भरलेले असते. उन्हाची तीव्रता नसते, रिमझिम पावसाच्या सरी पडत असतात. त्यामुळे बाजरी हे पिक पावसाच्या पाण्यावरच येते; पण पावसाने दडी मारल्याने बाजरीची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

०१ नीरा

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून बाजरीची पेरणी केली, पण कडक उन्हाने उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे.