शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पावसाची दडी, पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

नीरा : यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जून महिना संपला तरी ...

नीरा : यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जून महिना संपला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. काहींनी तर आगाप पेरणी केल्या. त्याच्या पिकांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊन दुबार पेरणीचे ‘संकट आ वासून’ आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आठ जून रोजी पहिले मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच शेतात पाळी घालणे, पिकांचे नियोजन करणे आदी कामांना सुरुवात केली. परंतु काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर संपूर्ण नक्षत्र कोरडे गेले. २१ जूनला दुसरे आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. कोल्हा हे या नक्षत्राचे वाहन असून या नक्षत्रानेही शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. तसेच अजूनही आठवडाभर पाऊस होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीने सर्वच पिकांच्या दुबार, तिबार पेरण्या करूनही पिके नष्ट झाली होती. परिणामी या वर्षीसाठी जादा दराने बियाणे खरेदी करण्यात आली आहेत. वाटाण्याचे दरही मागील वर्षीपेक्षा जास्त वाढले असून, भुईमूग बियाणे तब्बल २०० रुपयांवर गेले आहे. कांद्याचे बियाणे व इतर पिकांचे बियाणे जादा भावाने खरेदी करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाच्या भरवश्यावर पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, ते विहिरीचे पाणी देत आहेत. परंतु ज्यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही ते मात्र अद्यापही हातावर हात मांडून बसले आहेत.

राख येथील शेतकरी विनायक पवार यांनी पहिल्या दोन-तीन पावसांनंतर बाजरी पेरली. आता पावसाची नितांत गरज आहे. जमिनीत ओल आहे, पण मातीच्यावर तापमानत प्रचंड उष्णता असल्याने कोंब जळत आहेत. या दिवसात आभाळ भरलेले असते. उन्हाची तीव्रता नसते, रिमझिम पावसाच्या सरी पडत असतात. त्यामुळे बाजरी हे पिक पावसाच्या पाण्यावरच येते; पण पावसाने दडी मारल्याने बाजरीची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

०१ नीरा

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून बाजरीची पेरणी केली, पण कडक उन्हाने उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे.