शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पावसाने दिली खरिपाला साथ

By admin | Updated: July 25, 2016 02:15 IST

जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली असून, १९ जुलैपर्यंत ४८ टक्के पेरण्या झाल्या होत्या

पुणे : जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली असून, १९ जुलैपर्यंत ४८ टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्या ६० टक्क्यांपर्यंत गेल्या असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.या हंगामात सोयाबीन व मका लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत २७४ टक्के सोयाबीन व मका ११५ टक्केपर्यंत लागवड झाली आहे. जून महिन्यात फक्त ८१.३६ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पेरण्या कशा करायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. जून महिन्यात फक्त ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, जुलै महिन्यात पाऊस शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीच पाणी झाले. मात्र, तो सतत कोसळत असल्याने पेरण्यांसाठी परिस्थिती निर्माण होऊनही करता येत नव्हत्या. मात्र, १० जुलैैनंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांनी वेग घेतला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात २३ टक्केपर्यंत गेलेल्या पेरण्यात आता १९ जुलैैपर्यंत आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैकी १६ लाख ९१ हजार हेक्टरवर म्हणजे, ४८ टक्के पेरण्या झाल्या. गेल्या पाच-सहा दिवसांत चांगल्या पेरण्या झाल्या असून, त्या ६० टक्क्यांपर्यंत झाल्याचा आंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)