शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

रेल्वेसेवा दुस-या दिवशीही कोलमडली; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:44 IST

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणा-या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या.

पुणे : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणाºया लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या. पुण्यातून मुंबईकडे जाणा-या डेक्कन, इंटरसिटी व इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. उद्या गुरूवारी काही प्रमाणात ही स्थिती सुधारेल, अशी शक्यता रेल्वे अधिकाºयांनी बोलून दाखविली.आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने पहाटेपासूनचे या मार्गावरील अनेक गाड्या पुणे मार्गावरून रवाना करण्यात आले. काही गाड्या रद्द तर काही गाड्यां मध्येच थांबविण्यात आले. मुंबईकडे जाणाºया अनेक गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्याने सकाळी मध्य रेल्वे मार्गावर कोंडी झाली.बुधवारी चेन्नई-सीएसटी एक्सप्रेस, कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस, हुबळी एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई नागरकोईल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.तिकीट रेल्वेचे; प्रवास एसटीचानाशिक : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. बसेसद्वारे कल्याणपर्यंत पोहोचविण्यात आले. रेल्वेचे तिकीट दाखवून सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले. दुरांतो एक्स्प्रेस अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे मनमाड, नाशिक येथून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाशिक रोडला अडकलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने एसटीचे तिकीट काढावे लागले असले तरी इगतपुरीतील प्रवाशांना सुमारे १५ बसेसद्वारे कल्याणपर्यंत रेल्वेच्याच तिकिटावर नेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाला भाडे देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.मध्य रेल्वेने गुरूवारीतपोवन एक्स्प्रेस रद्द केली आहे. कोयना एक्स्प्रेस मुंबई-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली असून गुरूवारी पुणे स्थानकातूनच कोल्हापूरकडे रवाना केली जाईल. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस गुरूवारी मध्यरात्री १.४५ वाजता सोडण्यात येणार होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे