शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रेल्वेचा स्वच्छतेचा जागर, विविध कार्यक्रमांनी स्वच्छता पंधरवडा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:12 IST

पुणे: भारतीय रेल्वे १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील विविध विभागात ''स्वच्छता पंधरवडा '' साजरा करीत आहे. या ...

पुणे: भारतीय रेल्वे १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील विविध विभागात ''स्वच्छता पंधरवडा '' साजरा करीत आहे. या दरम्यान रेल्वे स्थानक, गाड्या, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये आदी ठिकाणी या पंधरा दिवसांत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. प्रवाशांनी स्थानकावर व रेल्वेत स्वच्छता राखावी, याकरिता त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. पुणे विभागात मोठ्या उत्साहात याची सुरुवात झाली.

मध्य रेल्वेने या पंधरवड्या दरम्यान गृहराज्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड -१९ संबंधित सर्व खबरदारी/प्रोटोकॉल व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत विविध उपक्रम राबविले जात आहे. या स्वच्छता अभियानात मुख्यालय व सर्व विभागीय स्तरावर स्वच्छता जागृतीसाठी आपापल्या कामाच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ देण्यापासून सुरू झाली. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणु शर्मा यांची उपस्थिती होती.

शनिवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीलम चंद्रा व प्रकाश उपाध्याय यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक विजयसिंह दडस यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेत स्वच्छता मोहीम राबवली गेली. यात झेलम, इंद्रायणी व नागपूर एक्स्प्रेसच्या रेकचा समावेश होता.