शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

निघोटवाडी येथे रेल्वे मोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी हद्दीतून जाणाऱ्या पुणे- नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पकरिता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण लेखी ...

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी हद्दीतून जाणाऱ्या पुणे- नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पकरिता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा देत निघोटवाडी येथील शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना निवेदन दिले आहे.

यावेळी निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, राजाराम निघोट, सुमंता निघोट, अशोक अण्णा निघोट, धनंजय निघोट, सुभाष निघोट, दिलीप बाणखेले, सनद निघोट व शेतकरी उपस्थित होते. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आंबेगाव तालुक्यातून तांबडेमळा, निघोटवाडी, वडगाव काशिंबेग अशी जाणार आहे. या रेल्वेसाठी मोजणीचे काम सुरू असून त्याला आता विरोध होऊ लागला आहे. निघोटवाडी ग्रामस्थांनी मोजणीला विरोध केला आहे. यासंदर्भात उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी डिंभा कालवा, डिंभे धरण पुनर्वसन, डिंभे कुकडी कॉलनी, मंचर-भीमाशंकर रस्ता, मंचर वडगाव काशिंबेग रस्ता, मंचर-सुलतानपूर रस्ता, तसेच खेड-सिन्नर बायपास रस्ता या सर्व प्रकल्पांकरीता मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या. यामुळे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. रेल्वे प्रकल्प निघोटवाडी हद्दीव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून घेण्यात यावा, निघोटवाडी परीसरातील सर्व शेतजमिनी बागायती असून सर्व शेतकरी व त्यांची कुटुंबे शेती व शेतीपूरक व्यवसाय मुख्यत्वे दुग्धव्यवसाय करून आपली उपजीविका करत आहेत. शेतकरी अल्पभूधारक असून रेल्वेमुळे जमिनीचे तुकडे झाल्यास १ ते २ गुंठे जमीन शेती शिल्लक राहणार आहेत. उर्वरित अल्प जमिनीतून कशाप्रकारे उपजीविका करावयाची किंवा शेती कशी करायची? हा प्रश्न निर्माण होणार आहे. या पूर्वी खेड-सिन्नर मंचर बायपास रस्त्यासाठी शेतजमिनी संपादित करताना दिलेला भाव हा अत्यल्प होता. यात गेलेले क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र असून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व यापुढेही चालणारा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. संपादित शेतकऱ्यांचे जमिनींना सर्वात कमी बाजारभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे या मोबदल्यातून आताच्या व पुढच्या येणाऱ्या पिढीचा उदरनिर्वाह कसा चालणार? हातातील जमीन गेली, गेलेल्या जमिनीस अल्प दराने मोबदला दिला गेला. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

चौकट

संपादित करताना दिलेला भाव हा अत्यल्प होता. हे क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र असून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व यापुढेही चालणारा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. संपादित शेतकऱ्यांचे जमिनींना सर्वात कमी बाजारभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्या मोबदल्यातून आताच्या व पुढच्या येणाऱ्या पिढीचा उदरनिर्वाह कसा चालणार? हातातील जमीन गेली, गेलेल्या जमिनीस अल्प दराने मोबदला दिला गेला. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे.