शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निघोटवाडी येथे रेल्वे मोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी हद्दीतून जाणाऱ्या पुणे- नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पकरिता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण लेखी ...

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी हद्दीतून जाणाऱ्या पुणे- नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पकरिता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा देत निघोटवाडी येथील शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना निवेदन दिले आहे.

यावेळी निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, राजाराम निघोट, सुमंता निघोट, अशोक अण्णा निघोट, धनंजय निघोट, सुभाष निघोट, दिलीप बाणखेले, सनद निघोट व शेतकरी उपस्थित होते. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आंबेगाव तालुक्यातून तांबडेमळा, निघोटवाडी, वडगाव काशिंबेग अशी जाणार आहे. या रेल्वेसाठी मोजणीचे काम सुरू असून त्याला आता विरोध होऊ लागला आहे. निघोटवाडी ग्रामस्थांनी मोजणीला विरोध केला आहे. यासंदर्भात उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी डिंभा कालवा, डिंभे धरण पुनर्वसन, डिंभे कुकडी कॉलनी, मंचर-भीमाशंकर रस्ता, मंचर वडगाव काशिंबेग रस्ता, मंचर-सुलतानपूर रस्ता, तसेच खेड-सिन्नर बायपास रस्ता या सर्व प्रकल्पांकरीता मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या. यामुळे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. रेल्वे प्रकल्प निघोटवाडी हद्दीव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून घेण्यात यावा, निघोटवाडी परीसरातील सर्व शेतजमिनी बागायती असून सर्व शेतकरी व त्यांची कुटुंबे शेती व शेतीपूरक व्यवसाय मुख्यत्वे दुग्धव्यवसाय करून आपली उपजीविका करत आहेत. शेतकरी अल्पभूधारक असून रेल्वेमुळे जमिनीचे तुकडे झाल्यास १ ते २ गुंठे जमीन शेती शिल्लक राहणार आहेत. उर्वरित अल्प जमिनीतून कशाप्रकारे उपजीविका करावयाची किंवा शेती कशी करायची? हा प्रश्न निर्माण होणार आहे. या पूर्वी खेड-सिन्नर मंचर बायपास रस्त्यासाठी शेतजमिनी संपादित करताना दिलेला भाव हा अत्यल्प होता. यात गेलेले क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र असून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व यापुढेही चालणारा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. संपादित शेतकऱ्यांचे जमिनींना सर्वात कमी बाजारभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे या मोबदल्यातून आताच्या व पुढच्या येणाऱ्या पिढीचा उदरनिर्वाह कसा चालणार? हातातील जमीन गेली, गेलेल्या जमिनीस अल्प दराने मोबदला दिला गेला. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

चौकट

संपादित करताना दिलेला भाव हा अत्यल्प होता. हे क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र असून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व यापुढेही चालणारा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. संपादित शेतकऱ्यांचे जमिनींना सर्वात कमी बाजारभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्या मोबदल्यातून आताच्या व पुढच्या येणाऱ्या पिढीचा उदरनिर्वाह कसा चालणार? हातातील जमीन गेली, गेलेल्या जमिनीस अल्प दराने मोबदला दिला गेला. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे.