शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रश्न राज ठाकरेंचा, उत्तर शरद पवारांचं, उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 11:09 IST

कला, साहित्य विषयात दोघांचाही व्यासंग दांडगा... दोघेही पक्षाचे नेते असल्याने राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी... एखाद्या मुद्द्यावर ठाकरीशैलीत राज ‘साहेबां’वर टीका करणार...

पुणे : कला, साहित्य विषयात दोघांचाही व्यासंग दांडगा... दोघेही पक्षाचे नेते असल्याने राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी... एखाद्या मुद्द्यावर ठाकरीशैलीत राज ‘साहेबां’वर टीका करणार... तर तितक्याच अधिकारवाणीने ‘साहेब’ राजला कानपिचक्या देणार....असं काहीसं हे राजकारणातलं दोघांचं नातं...मात्र राजकारण बाजूला सारून दोघेही एकाच व्यासपीठावर येणार आहेत, तेही एका वेगळ्या भूमिकेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक, क्रीडा कारकिर्दीचा प्रवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे संवादकाच्या भूमिकेतून उलगडणार आहेत.साहेबांचे राजकारणातील ‘राज’ वाक्चातुर्याने ठाकरे बाहेर काढण्यात यशस्वी होणार का? आणि ‘साहेब’ तितक्याच दिलखुलासपणे ठाकरीशैलीला मनमुरादपणे प्रतिसाद देणार का? याची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.जागतिक मराठी अकादमीतर्फे झालेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या निमित्ताने बुधवारी बृहन्महाराष्टÑ वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) येथे होणाºया या बहुप्रतीक्षेतील मुलाखतीकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही मुलाखत म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज ठरणार असल्याने कार्यक्रमाला राज्यभरातून कार्यकर्ते, रसिक, मान्यवर मंडळींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही!या वेळी शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लीला गांधी, चंदू बोर्डे, नागराज मंजुळे, विलास रकटे, संदीप वासलेकर, डॉ. पी. डी. पाटील, हणमंतराव गायकवाड या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.‘कासव’ या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाल्याबद्दलकरण्यात येणारा सत्कार ‘कासव टीम’च्या वतीने डॉ. मोहन आगाशे स्वीकारणार आहेत, असे संयोजक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि सचिन इटकर यांनी सांगितले.शरद पवार म्हणजे राजकारणातील अत्यंत मातब्बर असे व्यक्तिमत्त्व. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकही निवडणूक न हारण्याचे साहेबांचे रेकॉर्ड. राजकारणात मुरलेल्या साहेबांना बोलतं करण्याचे आव्हान भल्याभल्यांना घाम फोडते; मात्र त्यांच्याशी संवाद साधणारी व्यक्ती जर राजकारणातील असेल आणि त्यांनी लहानपणापासून साहेबांची कारकीर्द जवळून अनुभवली असेल, तर मग त्या मुलाखतीला वेगळा रंग चढल्याशिवाय राहणार नाही.या मुलाखतीद्वारे साहेबांच्या वाणीतून महाराष्ट्राची स्थित्यंतरे उलगडली जाणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी राज ठाकरे त्यांना कोणते प्रश्न विचारणार? साहेबांना वाक्चातुर्यातून ते कोंडीत पकडणार का? साहेब त्या प्रश्नांना बगल देणार की दिलखुलासपणे त्याला प्रत्युत्तर देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे