शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राघोजी भांगरे यांचा लढा आजही प्रेरणादायी

By admin | Updated: August 9, 2015 03:30 IST

इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले.

घोडेगाव : इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले. तेव्हा पुणे, नाशिक, ठाणे व अहमदनगर जिल्ह्यात इंग्रज व सावकारांविरुद्ध राघोजी भांगरे लढले. राघोजी भांगरेंचा लढा भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे. सन १८२८ मध्ये इंग्रजांनी आदिवासी भागात असलेले किल्ले, घाटमाथे राखण करण्याचे अधिकार काढून घेतले, तसेच अनेक बुरुज नष्ट केले, आदिवासी किल्लेदारांच्या किल्ल्या काढून घेतल्या, वनदऱ्या काढल्या व पगार कमी केले. त्यामुळे आदिवासी वतनदार व किल्लेदार यांच्यात असंतोष पसरला. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतसारा वाढविला. हा वाढलेला शेतसारा भरण्यासाठी आदिवासी लोक सावकारांकडून कर्ज काढू लागले. सावकार शेतकऱ्यांकडून भरमसाट व्याज गोळा करू लागले. शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात दावे दाखल करून मालमत्ता जप्त करण्याचे हुकूमनामे इंग्रजांकडून मिळवत असत. या सर्व छळवादाला चिडून आदिवासी लोकांनी इंग्रज व सावकारांविरुद्ध बंड पुकारले. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून सन १८३० मध्ये इंग्रजांनी फासावर लटकवले. यामुळे बंडखोरांमध्ये दहशत बसेल, असे इंग्रजांना वाटत होते; परंतु याचा परिणाम उलट झाला. पुणे व नगर जिल्ह्याच्या परिसरात आदिवासी समाजातील राघोजी व बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार उठाव सुरू झाला. राघोजी भांगरे अकोले तालुक्यातील नेरा गावातील होते. सन १८३८ मध्ये रतनगडाच्या परिसरात त्यांनी बंड उभे केले. इंग्रज अधिकारी कॅ. मॅकिटोस याने या भागातील खिंड, घाट, रस्ते यांची माहिती करून घेतली व बंडकऱ्यांचे सर्व मार्ग रोखून धरले. बंडखोरांची सर्व गुपिते बाहेर काढून त्यांना वेठीस धरले; मात्र बंडखोर नरमले नाहीत. इंग्रजांच्या ताब्यात असलेली चार ठिकाणे बंडखोरांनी लुटली. इंग्रजांनी हा सर्व भाग मोठे सैन्यबळ उभे केले. याला लोक घाबरले व काही लोक उलटले. माहितीच्या आधारावर इंग्रजांनी ८० लोकांना ताब्यात घेऊन नगरच्या तुरुंगात टाकले. इंग्रजांनी राघोजीला पकडण्याची मोहीम तीव्र केली. त्या काळी राघोजीला पकडण्यासाठी पाच हजार रुपये बक्षीस ठेवले. त्यांच्याजवळचे प्रमुख लोक ठार झाले, त्यामुळे राघोजी भांगरे थकले. २ जानेवारी १८४८ रोजी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. फाशी देण्याऐवजी तलवारीने किंवा बंदुकीने वीरपुरुषांसारखे मरण द्या, अशी मागणी त्याने न्यायाधीशांकडे केली; परंतु इंग्रज सरकारने २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्यांना फासावर चढविले. (वार्ताहर)