शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

खरीपाच्या नुकसानीनंतर रब्बी पिके धोक्यात उत्पन्नात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाने रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. ...

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाने रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. या रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, मका, हरभरा,आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. पण निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, तसेच या वातावरणातील बदलामुळे आणि थंडी कमी असल्याने गहू पिकावर मावा आला आहे.

यासोबतच हरभरा, मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सोबतच मर, करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रबी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात कांदा, गहू, हरभरा या पिकांना थंडी आवश्यक असते पण थंडीच गायब झाली आहे,

कांदा लावगडीपासून शेतकऱ्यांना एक एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत आहे, तरीही शेतकरी कांदा पिकासाठी धडपड करताना दिसत आहे.

--

परिसरातील कुरुळी, चिंबळी, निघोजे, मोई, आदी शेतकऱ्यांनी कांद्याची काही प्रमाणात लावगड केली आहे. मात्र मागे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा-रोपे गेल्याने बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकाची लागवड केली, परंतु मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तयार झाल्याने भाजीपाल्याचे भाव देखील ढासळले, ढगाळ वातावरण व भाव नसल्याने भाजीपाला पीक घेणे अवघड झाले आहे, हे वातावरण आणखी काही दिवस असेच राहिल्यास केलेला खर्चही वसूल होईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

--