शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाच्या नुकसानीनंतर रब्बी पिके धोक्यात उत्पन्नात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाने रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. ...

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाने रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. या रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, मका, हरभरा,आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. पण निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, तसेच या वातावरणातील बदलामुळे आणि थंडी कमी असल्याने गहू पिकावर मावा आला आहे.

यासोबतच हरभरा, मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सोबतच मर, करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रबी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात कांदा, गहू, हरभरा या पिकांना थंडी आवश्यक असते पण थंडीच गायब झाली आहे,

कांदा लावगडीपासून शेतकऱ्यांना एक एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत आहे, तरीही शेतकरी कांदा पिकासाठी धडपड करताना दिसत आहे.

--

परिसरातील कुरुळी, चिंबळी, निघोजे, मोई, आदी शेतकऱ्यांनी कांद्याची काही प्रमाणात लावगड केली आहे. मात्र मागे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा-रोपे गेल्याने बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकाची लागवड केली, परंतु मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तयार झाल्याने भाजीपाल्याचे भाव देखील ढासळले, ढगाळ वातावरण व भाव नसल्याने भाजीपाला पीक घेणे अवघड झाले आहे, हे वातावरण आणखी काही दिवस असेच राहिल्यास केलेला खर्चही वसूल होईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

--