शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कमकुवत पोलीस यंत्रणेमुळे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 01:04 IST

एका पोलीस दूरक्षेत्रावर व दोन पोलिसांवर २५ ते ३० गावांची जबाबदारी, अनेक दूरक्षेत्रात दूरध्वनीचा अभाव, अपुरे कर्मचारी, बंद पडलेल्या पोलीस व्हॅन यांमुळे फिर्याद दाखल होण्यास ४ ते ५ दिवस

एका पोलीस दूरक्षेत्रावर व दोन पोलिसांवर २५ ते ३० गावांची जबाबदारी, अनेक दूरक्षेत्रात दूरध्वनीचा अभाव, अपुरे कर्मचारी, बंद पडलेल्या पोलीस व्हॅन यांमुळे फिर्याद दाखल होण्यास ४ ते ५ दिवस, तर तपासाला महिनोन्महिने लागतात, अशी अवस्था आहे भोर तालुक्यातील पोलीस ठाण्यांची. पुणे-सातारा महामार्गावरून वारंवार जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, विविध सणांच्या बंदोबस्तासाठी लागणारे पोलीस, यामुळे अगोदरच कमी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. पोलिसांच्या संख्येसंर्दभात आजही ब्रिटिशकालीन नियमांची अंमलबजावणी होत आहे.२०११ च्या जनगणनेनुसार भोर तालुक्यात १९७ गावे व १५५ ग्रामपंचायती असून, सुमारे एक लाख ८२ हजार लोकसंख्या आहे. तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. पूर्व भागातून पुणे-सातारा महामार्ग जात असल्याने दररोज तीनचार अपघात घडतात. पेट्रोलपंपावर दरोडे पडतात. हॉटेलसमोर थांबलेल्या गाड्यांमध्ये चोऱ्या होतात. त्यामुळे हा भाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. महामार्गावर खेडशिवापूर, शिंदेवाडी, राजगड, किकवी ही पोलीस दूरक्षेत्र येत असून, ७० ग्रामपंचायती आहेत, तर भोर पोलीस ठाण्यांतर्गत हिर्डोशी व पसुरे ही दोन पोलीस दूरक्ष्ोत्र आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांत कर्मचारी अत्यंत कमी असून, तालुक्यात अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर पोलीस पाठवावे लागत असल्याने उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.तालुक्याचा पूर्व भाग दुर्गम डोंगरी व दाट झाडी, वर्दळ कमी असल्याने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या भागाचा सर्रास वापर केला जातो. नीरादेवघर धरण भागात ३१ गावांना हिर्डोशी हे एकमेव दूरक्षेत्र आहे. तेथे दोन हवालदार काम करतात. या भागात दारूचे अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक गावात त्याची विक्रीही करतात; मात्र त्याकडे पोलीस काणाडोळा करीत असल्याने गावा-गावांत वादावादी होते. यातून गुन्हेगार निर्माण होत आहेत, तर भाटघर धरण भागात पसुरे हे दूरक्ष्ोत्र असून, २१ गावे संवेदनशील आहेत. या भागातही दोन पोलीस दोन हवालदार काम करतात.पोलीस कर्मचारी कमी असल्याने व स्वत:चे वाहन नसल्याने खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबरोबर त्यांना वाहनांची व्यवस्था करणे, नवीन पोलीस दूरक्षेत्र वाढविण्यासह मंजूर पोलीस दूरक्षेत्र असलेल्या गावात इमारती बांधणे गरजेचे आहे. पोलिसांनी खाकीचा वापर करून प्रामाणिकपणे काम केल्यास सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांच्या प्रमुखांनी पुढाकर घ्यायला हवा, तरच ते शक्य होणार आहे.