शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

अकरावी सीईटीसाठी एससीईआरटीकडून सरावासाठी प्रश्नसंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर ...

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु,राज्य मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच हवे आहेत का, असा प्रश्न एससीईआरटीने विचारला आहे. विद्यार्थी व पालकांकडून मागणी झाल्यास एससीईआरटी प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहे.

इयत्ता दहावीचा निकाल यंदा शाळा स्तरावर शिक्षकांकडून देण्यात आलेल्या गुणांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात. त्यामुळे सीईटी परीक्षा घेणे योग्य आहे, असा एक मतप्रवाह आहे.

सर्वसाधारणपणे दर वर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. दहावीच्या निकालाची कामकाज अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रश्न संच उपलब्ध करून देण्याबाबत एससीईआरटीकडून विचार केला जात आहे.