शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी सीईटीसाठी एससीईआरटीकडून सरावासाठी प्रश्नसंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर ...

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु,राज्य मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच हवे आहेत का, असा प्रश्न एससीईआरटीने विचारला आहे. विद्यार्थी व पालकांकडून मागणी झाल्यास एससीईआरटी प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहे.

इयत्ता दहावीचा निकाल यंदा शाळा स्तरावर शिक्षकांकडून देण्यात आलेल्या गुणांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात. त्यामुळे सीईटी परीक्षा घेणे योग्य आहे, असा एक मतप्रवाह आहे.

सर्वसाधारणपणे दर वर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. दहावीच्या निकालाची कामकाज अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रश्न संच उपलब्ध करून देण्याबाबत एससीईआरटीकडून विचार केला जात आहे.