शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 26, 2017 03:32 IST

जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.जुन्नर तालुक्यात पाच धरणे असल्यामुळे हा तालुका बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या धरणांमधून कालवा व तालुक्यात कुकडी, मीना, मांडवी या नद्यांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या नद्यांवर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. या योजना राबवत असताना शेतकऱ्यांनी पाण्यावर तरफेचा वापर करून पाण्यावर तरंगत्या मोटारी बसविल्या आहेत. जसजसे नदीमधील पाणी कमी कमी होत जाते, तशा मोटारी आपोआप नदीकडेला येत असतात. अशा वेळी शेतकरी ती मोटार पुढे जाण्यासाठी व मोटारच्या फुटवॉलमधील अडकलेला कचरा काढण्यासाठी नदीप्रवाहाच्या पाण्यात उतरतात. अशा वेळी विजेचा शॉक लागून त्यांचा अपघात होतो. अशा घटना गेल्या पाच वर्षांत तीन वेळा घडल्या आहेत. त्यामध्ये कांदळी व वडगाव कांदळी येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. गेल्या तीन आठवड्यातच तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी व एकांतपणा असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीला जात आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी स्वस्तामधील आणि हलका दर्जा असलेल्या केबल वापरत आहेत. या हलक्या दर्जाच्या केबल वापरल्याने या केबल लवकर खराब होतात व त्यामधील वायर उघडी पडून त्याचा शॉक मोटारीच्या लोखंडी साडग्याला लागून अपघात होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांवर आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित.