शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 26, 2017 03:32 IST

जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.जुन्नर तालुक्यात पाच धरणे असल्यामुळे हा तालुका बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या धरणांमधून कालवा व तालुक्यात कुकडी, मीना, मांडवी या नद्यांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या नद्यांवर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. या योजना राबवत असताना शेतकऱ्यांनी पाण्यावर तरफेचा वापर करून पाण्यावर तरंगत्या मोटारी बसविल्या आहेत. जसजसे नदीमधील पाणी कमी कमी होत जाते, तशा मोटारी आपोआप नदीकडेला येत असतात. अशा वेळी शेतकरी ती मोटार पुढे जाण्यासाठी व मोटारच्या फुटवॉलमधील अडकलेला कचरा काढण्यासाठी नदीप्रवाहाच्या पाण्यात उतरतात. अशा वेळी विजेचा शॉक लागून त्यांचा अपघात होतो. अशा घटना गेल्या पाच वर्षांत तीन वेळा घडल्या आहेत. त्यामध्ये कांदळी व वडगाव कांदळी येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. गेल्या तीन आठवड्यातच तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी व एकांतपणा असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीला जात आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी स्वस्तामधील आणि हलका दर्जा असलेल्या केबल वापरत आहेत. या हलक्या दर्जाच्या केबल वापरल्याने या केबल लवकर खराब होतात व त्यामधील वायर उघडी पडून त्याचा शॉक मोटारीच्या लोखंडी साडग्याला लागून अपघात होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांवर आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित.