शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 26, 2017 03:32 IST

जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.जुन्नर तालुक्यात पाच धरणे असल्यामुळे हा तालुका बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या धरणांमधून कालवा व तालुक्यात कुकडी, मीना, मांडवी या नद्यांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या नद्यांवर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. या योजना राबवत असताना शेतकऱ्यांनी पाण्यावर तरफेचा वापर करून पाण्यावर तरंगत्या मोटारी बसविल्या आहेत. जसजसे नदीमधील पाणी कमी कमी होत जाते, तशा मोटारी आपोआप नदीकडेला येत असतात. अशा वेळी शेतकरी ती मोटार पुढे जाण्यासाठी व मोटारच्या फुटवॉलमधील अडकलेला कचरा काढण्यासाठी नदीप्रवाहाच्या पाण्यात उतरतात. अशा वेळी विजेचा शॉक लागून त्यांचा अपघात होतो. अशा घटना गेल्या पाच वर्षांत तीन वेळा घडल्या आहेत. त्यामध्ये कांदळी व वडगाव कांदळी येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. गेल्या तीन आठवड्यातच तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी व एकांतपणा असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीला जात आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी स्वस्तामधील आणि हलका दर्जा असलेल्या केबल वापरत आहेत. या हलक्या दर्जाच्या केबल वापरल्याने या केबल लवकर खराब होतात व त्यामधील वायर उघडी पडून त्याचा शॉक मोटारीच्या लोखंडी साडग्याला लागून अपघात होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांवर आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित.