शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

नदीपात्रातील वसाहतींवर टांगती तलवार

By admin | Updated: February 4, 2016 01:41 IST

हरित न्यायाधिकरणाने नदीपात्रातील रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने नदीपात्रातील काही वसाहतींना नोटिसा बजावल्या आहेत

पुणे : हरित न्यायाधिकरणाने नदीपात्रातील रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने नदीपात्रातील काही वसाहतींना नोटिसा बजावल्या आहेत. ‘तुमची घरे अधिकृत असल्याबाबतची कागदपत्रे पालिकेला मुदतीत सादर करावीत; अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल,’ अशी धमकीही या नोटिशीत देण्यात आली आहे. १४२ सदनिकांमधील रहिवासी पालिकेच्या या तुघलकी कारभाराने हैराण झाले आहेत.नदीपात्रातील रस्ता बांधणीचे प्रकरण पालिकेच्या अंगलट आले आहे. काही संस्थांनी या रस्त्याच्या विरोधात हरित न्यायाधिकरणात दाद मागितली. नदीपात्रातील रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे असा त्यांचा मुद्दा होता. रस्ता तयार करताना पालिकेने बऱ्याच नियमांचे उल्लंघन केले. त्याचा आधार घेत केलेल्या या याचिकेचा निकाल पालिकेच्या विरोधात गेला. पालिकेने उच्च न्यायालयात अपील केले. तिथेही निकाल त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर या निकालाला पालिकेने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र तिथेही त्यांना हार खावी लागली. त्यामुळे काही कोटी रुपये खर्च केलेला हा रस्ता उखडण्यासाठी पालिकेला पुन्हा काही कोट रुपये खर्च करावे लागले.या निकालामुळे पालिका प्रशासन ताकही फुंकून पिऊ लागले आहे; मात्र त्याचा त्रास कर्ज काढून घरे घेतलेल्या रहिवाशांना होत आहे. नदीपात्राच्या कडेने गेल्या काही वर्षांत अनेक वसाहती झाल्या. पूर्वी या परिसराचा काही भाग पालिका हद्दीत तर काही ग्रापंचायतीच्या हद्दीत होता. त्या वेळीही पूररेषेची पाटंबधारे खात्याने निश्चित केलेली हद्द पाहूनच बांधकामांना परवानगी दिली जात होती. गेल्या काही वर्षांत हा सर्वच परिसर पालिकेच्या हद्दीत आला. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांना पालिकेने गुंठेवारीचा कायदा लावून अधिकृत करून घेतले. त्यासाठी शुल्क वसूल केले. नव्याने अनेक बांधकामांना परवानगी दिली.मात्र, आता यातील काही बांधकामे पूररेषेच्या आत असल्याचा साक्षात्कार पालिकेच्या बांधकाम विभागाला झाला आहे. न्यायाधिकरणाच्या निर्णयाचा आधार घेत पालिकेने १४२ सदनिकांमधील रहिवाशांना या नोटिसा दिल्या आहेत. पालिकेच्याच परवानगीने, पाटंबधारे विभागाने निश्चित केलेल्या पूररेषेच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे आयुष्यभराची कमाई टाकून किंवा कर्ज काढून विकत घेतलेल्या या कुटुंबांवर पालिकेच्या या नोटिशीने संक्रातच आली आहे. यातील अनेकजण हतबल झाले आहेत. रस्ता उखडण्याबाबतच्या निर्णयामुळे तर त्यांना आपल्या घरावरही हातोडा पडणार, असे वाटू लागले आहे.