शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

आळंदीकरांना देणार शुद्ध पाणी

By admin | Updated: January 1, 2015 23:43 IST

भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

चाकण : भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युतीचे सरकार असल्याने आळंदीकरांना लवकरच शुद्ध पाणी देणार, असे आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत सांगितले.तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. आळंदी पालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उपनगराध्यक्षा अंजना कुऱ्हाडे, नगरसेवक अशोक कांबळे, अलका बवले, वर्षा कोद्रे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे, रमेश गोगावले, अ‍ॅड. विलास काटे, महादेव पाखरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.गोरे म्हणाले की, भामा आसखेडचे पुण्याला जाणारे पाणी आळंदीतून जात असल्याने प्रथम आळंदीकरांना पाणी देत नाही, तोपर्यंत पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनचे काम अडविले जाणार आहे. आळंदी आणि परिसरातील गावांना भामा आसखेडचे पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सध्या शासन स्तरावरील अंतिम टप्प्यातील आळंदी शहर प्रारूप विकास आराखड्यास मुख्यमंत्री स्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून कामे संथ गतीने होत आहे, शहरातील रस्ते, गटारे, पिण्याची पाईपलाईन ही कामे निधी असूनही वेळेत झाली नाहीत. लवकरच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची आळंदीत बैठक होऊन कामे गतीने होण्यासाठी भर देणार आहे. रस्त्यांचा विकास करताना, अतिक्रमण कारवाई करताना हयगय केली जाणार नाही. कामे वेळेत झाली नाहीत तर निधी पुन्हा माघारी जाण्याची शक्यता असल्याची माहिती गोरे यांनी दिली. (वार्ताहर)आळंदी पालिकेने जिल्हास्तर नगरोत्थान अभियानांतर्गत मिळालेल्या सत्तर लाख निधी आणि पालिकेच्या वीस लाख असे एकूण नव्वद लाख रूपयांतून आळंदीतील सिद्ध बेट मधील जलशुद्धीकरण यंत्रणेतील जुनाट यंत्रे, व्हॉल्व, पाईप बदलण्याचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड, फिल्टर मीडिया बनविण्याचे काम झाले आहे. सेटलिंक टँक बनविला असून, लवकरच दोन दिवसांत आळंदीकरांना पूर्वीपेक्षा चांगले पाणी मिळणार आहे.- विनायक औंधकर, मुख्याधिकारी