शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आळंदीकरांना देणार शुद्ध पाणी

By admin | Updated: January 1, 2015 23:43 IST

भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

चाकण : भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युतीचे सरकार असल्याने आळंदीकरांना लवकरच शुद्ध पाणी देणार, असे आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत सांगितले.तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. आळंदी पालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उपनगराध्यक्षा अंजना कुऱ्हाडे, नगरसेवक अशोक कांबळे, अलका बवले, वर्षा कोद्रे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे, रमेश गोगावले, अ‍ॅड. विलास काटे, महादेव पाखरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.गोरे म्हणाले की, भामा आसखेडचे पुण्याला जाणारे पाणी आळंदीतून जात असल्याने प्रथम आळंदीकरांना पाणी देत नाही, तोपर्यंत पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनचे काम अडविले जाणार आहे. आळंदी आणि परिसरातील गावांना भामा आसखेडचे पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सध्या शासन स्तरावरील अंतिम टप्प्यातील आळंदी शहर प्रारूप विकास आराखड्यास मुख्यमंत्री स्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून कामे संथ गतीने होत आहे, शहरातील रस्ते, गटारे, पिण्याची पाईपलाईन ही कामे निधी असूनही वेळेत झाली नाहीत. लवकरच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची आळंदीत बैठक होऊन कामे गतीने होण्यासाठी भर देणार आहे. रस्त्यांचा विकास करताना, अतिक्रमण कारवाई करताना हयगय केली जाणार नाही. कामे वेळेत झाली नाहीत तर निधी पुन्हा माघारी जाण्याची शक्यता असल्याची माहिती गोरे यांनी दिली. (वार्ताहर)आळंदी पालिकेने जिल्हास्तर नगरोत्थान अभियानांतर्गत मिळालेल्या सत्तर लाख निधी आणि पालिकेच्या वीस लाख असे एकूण नव्वद लाख रूपयांतून आळंदीतील सिद्ध बेट मधील जलशुद्धीकरण यंत्रणेतील जुनाट यंत्रे, व्हॉल्व, पाईप बदलण्याचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड, फिल्टर मीडिया बनविण्याचे काम झाले आहे. सेटलिंक टँक बनविला असून, लवकरच दोन दिवसांत आळंदीकरांना पूर्वीपेक्षा चांगले पाणी मिळणार आहे.- विनायक औंधकर, मुख्याधिकारी