शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेलूच्या आदिवासी बांधवांच्या टाक्याच्या ठाकरवाडीला शुद्ध पिण्याचे पाणी;महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच अक्षय पडवळ,ग्रा.पं.सदस्य अक्षय ...

या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच अक्षय पडवळ,ग्रा.पं.सदस्य अक्षय गाडे,संतोष पडवळ,माजी सरपंच दत्ता करंडे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

भामा आसखेड धरण जवळ असूनही अनेक गावे अजूनही तहानलेली आहेत.त्यापैकी एक असलेल्या शेलू गावची पडवळ वस्ती आणि आदिवासी बांधवांची टाक्याची ठाकरवाडीला पिण्याचे पाणी नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. भामा आसखेड धरणावरील प्रादेशिक योजनेमध्ये शेलु गावचा समावेश नसल्याने पाणी पुरवठा देता येत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून हे कनेक्शन मिळवून या पाणी पुरवठा योजनेसाठी २८ लाख रुपयांचा निधी खर्च करून दोन्ही वस्त्यांसाठी शुद्ध पाणी पुरवठा नळ योजना सुरू केली आहे.यामुळे गेली अनेक वर्षांपासून टाक्याची ठाकरवाडीची पाणी टंचाई दूर होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.

या योजनेसाठी सोमनाथ पडवळ,माजी ग्रा.पं. सदस्य संतोष पडवळ यांनी आपली लाखो रुपये किमतीची स्वतःची काही जागा साठवण टाकी साठी बक्षीस पत्र करून दिली.योजनेला विद्युत मोटारीची गरज लागत नसल्याने वीज बिलाच्या खर्चाची बचत होणार आहे.सर्व नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवले जात असून कनेक्शनसाठी पाणी मीटरचा अवलंब करण्यात आला आहे.पाणी नळाद्वारे दारात आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.