शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

पुरंदरमध्ये होणार ३८० कोटी लिटर पाणीसाठा

By admin | Updated: March 22, 2016 01:46 IST

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले

जेजुरी : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले, तर सुमारे ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकेल, अशी खात्री पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुरंदर तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात दिवे, सोनोरी, पानवडी, वाल्हे, नावळी, पिंगोरी, साकुर्डे, वाळुंज, गुळुंचे, एखतपूर, सटलवाडी, काळदरी, देवडी, भिवडी, मांढर, टेकवडी, नवलेवाडी, परिंचे, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर, सिंगापूर या बावीस गावांतून जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. पाझर तलाव, नाले, ओढे खोलीकरणाची कामे लोकसहभागातून झाली आहेत. शासनाचे कृषी विभाग, लघुसिंचन, छोटे पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण या सर्व यंत्रणांमार्फत या बावीस गावांचा ६० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात ४७ कोटी रुपये खर्चाची ७४७ कामे हाती घेण्यात आली होती. पैकी ५५७ कामे सुरू असून, यातील ४३२ कामे पूर्ण झालेली आहेत. तर, १२५ कामे सुरू आहेत. यासाठी आतापर्यंत सुमारे १७ कोटी ३३ लाख रुपये खर्च झालेला आहे. यातून १७ लाख ४२ हजार घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या वर्षी ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकतो. अजून खूप कामे होणार आहेत. याशिवाय या वर्षीही सण २०१६-२०१७ या वर्षात अजून २३ गावांचा समावेश या योजनेत केलेला आहे. यात बेलसर, पांगारे, पिंपरी, खळद, घेरापुरंदर, आसकरवाडी, कोळविहिरे, हरणी, खानवडी, दौंडज, राख, नायगाव, माळशिरस, भिवरी, वनपुरी, पिसुर्टी, कर्नलवाडी, गराडे, कोडीत, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोर्हारळवाडी या गावांचा समावेश असून, या गावासाठी साधारणपणे ४४ कोटी ९२ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या खर्चातून सुमारे २२०० कामे प्रस्तावित करण्यात आलेली असून, एप्रिलपासून याही कामांना सुरुवात केली जाणार आहे, असेही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. >पुणे जिल्ह्याचा विचार करता सर्वांत जास्त काम पुरंदर तालुक्यात झालेले असून, पावसाळ्यात पर्जन्यमान जर व्यवस्थित राहिले, तर मोठा पाणीसाठा होऊ शकतो.जेथे ही कामे झालेली आहेत त्या ठिकाणी किमान दोन वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावाही ढगे यांनी केला आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत काम करण्यासाठी गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभाग, संस्था, कंपन्याही या कामासाठी सहकार्य करीत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अशाच प्रकारचा सहभाग व प्रतिसाद लाभला. यामुळेच मोठ्या प्रमाणावर काम होऊ शकले.