शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये होणार ३८० कोटी लिटर पाणीसाठा

By admin | Updated: March 22, 2016 01:46 IST

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले

जेजुरी : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले, तर सुमारे ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकेल, अशी खात्री पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुरंदर तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात दिवे, सोनोरी, पानवडी, वाल्हे, नावळी, पिंगोरी, साकुर्डे, वाळुंज, गुळुंचे, एखतपूर, सटलवाडी, काळदरी, देवडी, भिवडी, मांढर, टेकवडी, नवलेवाडी, परिंचे, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर, सिंगापूर या बावीस गावांतून जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. पाझर तलाव, नाले, ओढे खोलीकरणाची कामे लोकसहभागातून झाली आहेत. शासनाचे कृषी विभाग, लघुसिंचन, छोटे पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण या सर्व यंत्रणांमार्फत या बावीस गावांचा ६० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात ४७ कोटी रुपये खर्चाची ७४७ कामे हाती घेण्यात आली होती. पैकी ५५७ कामे सुरू असून, यातील ४३२ कामे पूर्ण झालेली आहेत. तर, १२५ कामे सुरू आहेत. यासाठी आतापर्यंत सुमारे १७ कोटी ३३ लाख रुपये खर्च झालेला आहे. यातून १७ लाख ४२ हजार घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या वर्षी ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकतो. अजून खूप कामे होणार आहेत. याशिवाय या वर्षीही सण २०१६-२०१७ या वर्षात अजून २३ गावांचा समावेश या योजनेत केलेला आहे. यात बेलसर, पांगारे, पिंपरी, खळद, घेरापुरंदर, आसकरवाडी, कोळविहिरे, हरणी, खानवडी, दौंडज, राख, नायगाव, माळशिरस, भिवरी, वनपुरी, पिसुर्टी, कर्नलवाडी, गराडे, कोडीत, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोर्हारळवाडी या गावांचा समावेश असून, या गावासाठी साधारणपणे ४४ कोटी ९२ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या खर्चातून सुमारे २२०० कामे प्रस्तावित करण्यात आलेली असून, एप्रिलपासून याही कामांना सुरुवात केली जाणार आहे, असेही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. >पुणे जिल्ह्याचा विचार करता सर्वांत जास्त काम पुरंदर तालुक्यात झालेले असून, पावसाळ्यात पर्जन्यमान जर व्यवस्थित राहिले, तर मोठा पाणीसाठा होऊ शकतो.जेथे ही कामे झालेली आहेत त्या ठिकाणी किमान दोन वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावाही ढगे यांनी केला आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत काम करण्यासाठी गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभाग, संस्था, कंपन्याही या कामासाठी सहकार्य करीत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अशाच प्रकारचा सहभाग व प्रतिसाद लाभला. यामुळेच मोठ्या प्रमाणावर काम होऊ शकले.