शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पुरंदर उपसाचे पाणी आजपासून मिळणार; पण देखभाल दुरूस्तीचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना शुक्रवार (दि.१२) पासून सुरू होणार आहे. यामुळे येथील ...

भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना शुक्रवार (दि.१२) पासून सुरू होणार आहे. यामुळे येथील शेती पुन्हा बहरणार आहे. या वर्षी पाणी चोरांवर लक्ष ठेवले जाणार आहे. मात्र, देखभाल दुरूस्तीअभावी वारंवार बंद पडणाऱ्या योजनेची ही समस्या कायमस्वरूपी दूर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदारचे स्वप्न पूर्ण पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने केले. आजतागायत या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे याेजनेतून पाणी सोडल्यावर अनेक ठिकाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. एअरवाॅल, पाइपलाइन अनेक ठिकाणी तुटते. यामुळे ही योजना तातडीने दुरुस्त करण्यासाठी मागणी या योजनेचा लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.

ही योजना सुरू करण्यसाठी या योजनेचे शाखा अभियंता गावागावात जाऊन पाण्याच्या मागण्या घेत आहेत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लाभार्थी गावातील शेतकरी देखील पैसे भरत आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३ हजार ७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६ हजार ४९८ असे २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने बंद झाली. यंदा तालुक्यात इतका पाऊस पडला की आजही अनेक गावात पाणी आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा मागील वर्षाच्या मानाने कमी आहे. यामुळे सहाजिकच या योजनेच्या पाण्याला मागणी कमी आहे.

चौकट

सध्या चढावरील अनेक गावांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी सर्वाधिक बंद पडली. यामुळे या वर्षी ही सुरळीत सुरू राहण्यासाठी दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. ही योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी दिवे लाईन, राजेवाडी लाईन व माळशिरस लाईन यापैकी कोणत्याही दोन लाईनची पुरेशी मागणी येणे गरजेचे आहे.

चौकट

पाणी चोरांवर राहणार लक्ष

सध्या पुरंदर उपसा योजना सुरू होणार असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. टोकाकडील गावांना पाणी सुरळीत देण्यासाठी यावर्षी पाणी चोरांवरती विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. पाणी चाेरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

नीलेश लगड, शाखा अभियंता, पुरंदर उपसा जलसिंचन योजना

फोटो ओळ - पुरंदर उपसा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदारचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरुवातीला जशी सुरू करण्यात आली ती आजतागायत या योजनेवरती पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे आज ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी गळते. एअरवाॅल, पाईपलाईन तुटते. यामुळे ही योजना तातडीने दुरुस्त करण्यासाठी मागणी या योजनेचा लाभार्थी गावातील शेतक-यांनी केली आहे. मात्र या मागणीला आतापर्यंत फक्त केराची टोपली दाखवली आहे.

पुरंदर तालुक्याला वरदान ठरणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी या योजनेचे शाखा अभियंता गावागावात जाऊन पाण्याच्या मागण्या घेत आहेत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणुन लाभार्थी गावातील शेतकरी देखील पैसे भरत आहेत. यामुळे मागणी होत असल्याने शुक्रवारपासून ही योजना सुरू होत आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०,दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने बंद झाली. यंदा तालुक्यात इतका पाऊस पडला की आजही अनेक गावात पाणी आहे.यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा मागील वर्षाच्या मानाने कमी आहे. यामुळे सहाजिकच या योजनेच्या पाण्याला मागणी कमी आहे. मात्र गेली दोन वर्षे लाभार्थी गावातील शेतक-यांनी मागणी केली आहे की पाणी सुरू झाल्यानंतर ही योजना वारंवार बंद पडते. ही योजना अनेक ठिकाणी गळते .टोकाकडील गावाकडे जाणारा पाण्याचा प्रवाह कमी होतो. यामुळे पैसे भरून देखील गावांना पाणी कमी मिळते. यामुळे ग॓ळणा-या पाण्याचा भुर्दंड सर्वसामान्य शेतक-यांना बसतो. यासाठी ही योजना तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. मात्र ही योजना आजही पाहीजे त्या प्रमाणात सुस्थितीत नाही. ही योजना बंद असताना मात्र सर्वांनीच दुर्लक्ष केले.

सध्या चढावरील अनेक गावांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी सर्वाधीक बंद पडली. यामुळे या वर्षी ही सुरळीत सुरू राहण्यासाठी दुरुस्ती होणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. ही योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी दिवे लाईन, राजेवाडी लाईन व माळशिरस लाईन यापैकी कोणत्याही दोन लाईनची पुरेशी मागणी येणे गरजेचे आहे. १) पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता नीलेश लगड म्हणाले कि सध्या पुरंदर उपसा योजना सुरु होणार असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.टोकाकडील गावांना पाणी सुरळीत देण्यासाठी यावर्षी पाणी चोरांवरती विषेश नजर ठेवण्यात येणार असुन कडक कारवाई करण्यात येणार आहे.

फोटो ओळ - पुरंदर उपसा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.