शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसाचे पाणी आजपासून मिळणार; पण देखभाल दुरूस्तीचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना शुक्रवार (दि.१२) पासून सुरू होणार आहे. यामुळे येथील ...

भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना शुक्रवार (दि.१२) पासून सुरू होणार आहे. यामुळे येथील शेती पुन्हा बहरणार आहे. या वर्षी पाणी चोरांवर लक्ष ठेवले जाणार आहे. मात्र, देखभाल दुरूस्तीअभावी वारंवार बंद पडणाऱ्या योजनेची ही समस्या कायमस्वरूपी दूर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदारचे स्वप्न पूर्ण पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने केले. आजतागायत या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे याेजनेतून पाणी सोडल्यावर अनेक ठिकाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. एअरवाॅल, पाइपलाइन अनेक ठिकाणी तुटते. यामुळे ही योजना तातडीने दुरुस्त करण्यासाठी मागणी या योजनेचा लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.

ही योजना सुरू करण्यसाठी या योजनेचे शाखा अभियंता गावागावात जाऊन पाण्याच्या मागण्या घेत आहेत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लाभार्थी गावातील शेतकरी देखील पैसे भरत आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३ हजार ७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६ हजार ४९८ असे २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने बंद झाली. यंदा तालुक्यात इतका पाऊस पडला की आजही अनेक गावात पाणी आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा मागील वर्षाच्या मानाने कमी आहे. यामुळे सहाजिकच या योजनेच्या पाण्याला मागणी कमी आहे.

चौकट

सध्या चढावरील अनेक गावांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी सर्वाधिक बंद पडली. यामुळे या वर्षी ही सुरळीत सुरू राहण्यासाठी दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. ही योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी दिवे लाईन, राजेवाडी लाईन व माळशिरस लाईन यापैकी कोणत्याही दोन लाईनची पुरेशी मागणी येणे गरजेचे आहे.

चौकट

पाणी चोरांवर राहणार लक्ष

सध्या पुरंदर उपसा योजना सुरू होणार असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. टोकाकडील गावांना पाणी सुरळीत देण्यासाठी यावर्षी पाणी चोरांवरती विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. पाणी चाेरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

नीलेश लगड, शाखा अभियंता, पुरंदर उपसा जलसिंचन योजना

फोटो ओळ - पुरंदर उपसा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदारचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरुवातीला जशी सुरू करण्यात आली ती आजतागायत या योजनेवरती पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे आज ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी गळते. एअरवाॅल, पाईपलाईन तुटते. यामुळे ही योजना तातडीने दुरुस्त करण्यासाठी मागणी या योजनेचा लाभार्थी गावातील शेतक-यांनी केली आहे. मात्र या मागणीला आतापर्यंत फक्त केराची टोपली दाखवली आहे.

पुरंदर तालुक्याला वरदान ठरणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी या योजनेचे शाखा अभियंता गावागावात जाऊन पाण्याच्या मागण्या घेत आहेत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणुन लाभार्थी गावातील शेतकरी देखील पैसे भरत आहेत. यामुळे मागणी होत असल्याने शुक्रवारपासून ही योजना सुरू होत आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०,दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने बंद झाली. यंदा तालुक्यात इतका पाऊस पडला की आजही अनेक गावात पाणी आहे.यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा मागील वर्षाच्या मानाने कमी आहे. यामुळे सहाजिकच या योजनेच्या पाण्याला मागणी कमी आहे. मात्र गेली दोन वर्षे लाभार्थी गावातील शेतक-यांनी मागणी केली आहे की पाणी सुरू झाल्यानंतर ही योजना वारंवार बंद पडते. ही योजना अनेक ठिकाणी गळते .टोकाकडील गावाकडे जाणारा पाण्याचा प्रवाह कमी होतो. यामुळे पैसे भरून देखील गावांना पाणी कमी मिळते. यामुळे ग॓ळणा-या पाण्याचा भुर्दंड सर्वसामान्य शेतक-यांना बसतो. यासाठी ही योजना तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. मात्र ही योजना आजही पाहीजे त्या प्रमाणात सुस्थितीत नाही. ही योजना बंद असताना मात्र सर्वांनीच दुर्लक्ष केले.

सध्या चढावरील अनेक गावांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी सर्वाधीक बंद पडली. यामुळे या वर्षी ही सुरळीत सुरू राहण्यासाठी दुरुस्ती होणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. ही योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी दिवे लाईन, राजेवाडी लाईन व माळशिरस लाईन यापैकी कोणत्याही दोन लाईनची पुरेशी मागणी येणे गरजेचे आहे. १) पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता नीलेश लगड म्हणाले कि सध्या पुरंदर उपसा योजना सुरु होणार असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.टोकाकडील गावांना पाणी सुरळीत देण्यासाठी यावर्षी पाणी चोरांवरती विषेश नजर ठेवण्यात येणार असुन कडक कारवाई करण्यात येणार आहे.

फोटो ओळ - पुरंदर उपसा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.