शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये राजकीय नेत्यांबरोबर मतदारांचीही कसोटी

By admin | Updated: February 15, 2017 01:51 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीनंतर आता पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तीन पक्ष सर्व ठिकाणी समोरासमोर

सासवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीनंतर आता पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तीन पक्ष सर्व ठिकाणी समोरासमोर आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना. जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत तर भाजपा व मनसे मात्र सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे करू शकले नाहीत. पक्ष, नेते, नातेगोते पाहून मतदान करायचे, की विकासाच्या मुद्याला महत्त्व द्यायचे असे प्रश्न मतदारांसमोर आहेत. तसेच एका पक्षाला बहुमत, की पुन्हा आघाडीचे राजकारण हा प्रश्न आहे. कारण यापूर्वी पंचायत समितीत राष्ट्रवादी व मनसेची आघाडी होती. या वेळी मात्र मनसे एकाच गटात निवडणूक लढवीत आहे . पुरंदरमधील राजकीय नेत्यांनाही त्यांच्या पक्षाने मोठी पदे दिली आहेत. शिवसेनेने राज्यमंत्री पद, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, मनसेचे महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद. या नेत्यांनी आपले पक्षाचे उमेदवार निवडून आणणे गरजेचे असून तेथेच त्यांची कसोटी लागणार आहे.यापूर्वी पंचायत समितीत २ जागा व जिल्हा परिषदेत एक जागा काँग्रेसकडे होती. ती टिकवून त्यात वाढ करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे तर राष्ट्रवादीची सत्ता होती ती टिकविण्याचे आव्हान त्यांचेपुढे आहे. शिवसेनेकडे मंत्रिपद आहे. मागील काळात पंचायत समितीत त्यांचा एकच उमेदवार निवडून आला होता. ही संख्या वाढविण्याची जबाबदारी मंत्र्यावर आहे. सासवड व जेजुरी नगरपालिका जिंकल्याने काँग्रेसमध्ये उत्साह आहे तर राष्ट्रवादीचे उमेदवार तगडे आहेत. शिवसेना विकासकामांच्या मदतीने मते मागत आहे.या सर्वांची प्रचाराची रणधुमाळी जाहीर सभा व गाठीभेटीतून सुरू आहे. प्रचारात सर्वच पक्ष आपण किती चांगले आहोत. यापेक्षा दुसरा किती वाईट आहे, याचाच उच्चार करीत आहेत. पुरंदर प्रस्तावित विमानतळ, गुंजवणीचे पाणी, पुरंदर उपसायोजनेचे पाणी, रस्ते असे विषय प्रामुख्याने या निवणुकीत आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने या मुद्याचा वापर करीत आहे.राजकीय नेत्यांची इतर पक्षांच्या नेत्याशी असलेली मैत्री हा कळीचा मुद्दा आहे. एका निवडणुकीत तू मला मदत कर दुसऱ्यात मी तुला करतो, असे प्रकार सुरू आहेत. ही मैत्री आतापर्यंत निभावली गेली आहे; पण आता मात्र आपला उमेदवार पाडून दुसऱ्या पक्षातील मित्राला निवडून आणणे, हे नेत्यांना महागात पडणार आहे. पुन्हा पहिलेच चेहरे मतदारांपुढे आले आहेत. इतर मागासवर्गीयसाठी राखीव पद असले तरी कुणबी दाखले मिळविले गेले, महिला राखीव असेल तर आपल्या पत्नीलाच उभे केले तर महिला राखीव नाही, मग स्वत:च उभे राहिले. पहिल्यांदा स्वत: पाच वर्षे मग महिला राखीव झाल्यावर आपलीच मुलगी व आता पुन्हा आपण स्वत: असे प्रकार झाले आहेत. या घराणेशाहीला मतदार धडा शिकवतात, की पुन्हा निवडून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (वार्ताहर)