शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये राजकीय नेत्यांबरोबर मतदारांचीही कसोटी

By admin | Updated: February 15, 2017 01:51 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीनंतर आता पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तीन पक्ष सर्व ठिकाणी समोरासमोर

सासवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीनंतर आता पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तीन पक्ष सर्व ठिकाणी समोरासमोर आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना. जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत तर भाजपा व मनसे मात्र सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे करू शकले नाहीत. पक्ष, नेते, नातेगोते पाहून मतदान करायचे, की विकासाच्या मुद्याला महत्त्व द्यायचे असे प्रश्न मतदारांसमोर आहेत. तसेच एका पक्षाला बहुमत, की पुन्हा आघाडीचे राजकारण हा प्रश्न आहे. कारण यापूर्वी पंचायत समितीत राष्ट्रवादी व मनसेची आघाडी होती. या वेळी मात्र मनसे एकाच गटात निवडणूक लढवीत आहे . पुरंदरमधील राजकीय नेत्यांनाही त्यांच्या पक्षाने मोठी पदे दिली आहेत. शिवसेनेने राज्यमंत्री पद, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, मनसेचे महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद. या नेत्यांनी आपले पक्षाचे उमेदवार निवडून आणणे गरजेचे असून तेथेच त्यांची कसोटी लागणार आहे.यापूर्वी पंचायत समितीत २ जागा व जिल्हा परिषदेत एक जागा काँग्रेसकडे होती. ती टिकवून त्यात वाढ करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे तर राष्ट्रवादीची सत्ता होती ती टिकविण्याचे आव्हान त्यांचेपुढे आहे. शिवसेनेकडे मंत्रिपद आहे. मागील काळात पंचायत समितीत त्यांचा एकच उमेदवार निवडून आला होता. ही संख्या वाढविण्याची जबाबदारी मंत्र्यावर आहे. सासवड व जेजुरी नगरपालिका जिंकल्याने काँग्रेसमध्ये उत्साह आहे तर राष्ट्रवादीचे उमेदवार तगडे आहेत. शिवसेना विकासकामांच्या मदतीने मते मागत आहे.या सर्वांची प्रचाराची रणधुमाळी जाहीर सभा व गाठीभेटीतून सुरू आहे. प्रचारात सर्वच पक्ष आपण किती चांगले आहोत. यापेक्षा दुसरा किती वाईट आहे, याचाच उच्चार करीत आहेत. पुरंदर प्रस्तावित विमानतळ, गुंजवणीचे पाणी, पुरंदर उपसायोजनेचे पाणी, रस्ते असे विषय प्रामुख्याने या निवणुकीत आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने या मुद्याचा वापर करीत आहे.राजकीय नेत्यांची इतर पक्षांच्या नेत्याशी असलेली मैत्री हा कळीचा मुद्दा आहे. एका निवडणुकीत तू मला मदत कर दुसऱ्यात मी तुला करतो, असे प्रकार सुरू आहेत. ही मैत्री आतापर्यंत निभावली गेली आहे; पण आता मात्र आपला उमेदवार पाडून दुसऱ्या पक्षातील मित्राला निवडून आणणे, हे नेत्यांना महागात पडणार आहे. पुन्हा पहिलेच चेहरे मतदारांपुढे आले आहेत. इतर मागासवर्गीयसाठी राखीव पद असले तरी कुणबी दाखले मिळविले गेले, महिला राखीव असेल तर आपल्या पत्नीलाच उभे केले तर महिला राखीव नाही, मग स्वत:च उभे राहिले. पहिल्यांदा स्वत: पाच वर्षे मग महिला राखीव झाल्यावर आपलीच मुलगी व आता पुन्हा आपण स्वत: असे प्रकार झाले आहेत. या घराणेशाहीला मतदार धडा शिकवतात, की पुन्हा निवडून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (वार्ताहर)