शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

दुष्काळी भागाला पुण्यातील धरणांचे पाणी

By admin | Updated: February 9, 2016 04:44 IST

राज्यात बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात जवळपास सर्वच धरणे कोरडी पडली आहेत. त्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शिल्लक पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे.

पुणे : राज्यात बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात जवळपास सर्वच धरणे कोरडी पडली आहेत. त्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शिल्लक पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. यामुळे एप्रिल-मे महिन्यात या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे अत्यंत भीषण संकट निर्माण होण्याची शक्याता आहे. यामुळेच पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, आंद्रा आणि वडिवळे धरणांमधील पाणी या दुष्काळग्रस्त भागासाठी राखीव ठेवण्यात येणार असून, मागणी झाल्यास त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी ‘लोकमत’ला दिली.विदर्भ वगळता राज्यात सर्वच विभागात दुष्काळ परिस्थिती आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच मराठवाड्यात पाणी टंचाईचे भीषण सावट निर्माण झाले आहे. मराठवाड्याचे आधारस्तंभ असलेल्या जायकवाडी धरणात आजअखेर केवळ ६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर परभणी येलदरी धरणात ५ टक्के, हिंगोली सिद्धेश्वर ४ टक्के, आणि नांदेडच्या विष्णूपुरी धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या जिल्ह्यातील धरणांमध्ये किमान थोडा तरी पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, येत्या काही दिवसांत टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहणार नाही.पुणे जिल्ह्यात सुमारे १९ धरणे आहेत. राज्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार नाही. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासह नगर, सोलापूर व अन्य जिल्ह्यांतील पिण्याची पाण्याची गरज लक्षात घेता, राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी राखीव ठेवण्याबाबत नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, आंद्रा, वडिवळे या धरणांमध्ये नदीत पाणी सोडून सिंचनासाठी वापरले जाते. या सर्वच प्रकल्पांमध्ये पूर्ण सिंचनाची क्षमता निर्माण झालेली नाही. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्याने या धरणांमधील पाणीदेखील सिंचनासाठी देण्यात येणार नाही. त्यामुळे या तीन धरणांमध्ये आजअखेर ८.१७ टीएमसी पाणी शिल्लक असून, राज्यातील कोणत्याही दुष्कळग्रस्त भागाला पाण्याची गरज लागल्यास या धरणांतील पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. याबाबतच नियोजन पाटबंधारे विभागाने केले असून, मागणी झाल्यास त्वरित पाणीपुरवठा करण्यात येईल, असे कपोले यांनी सांगितले.राज्यात इतर भागांत आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास राखीव ठेवण्यात येणार आहे. कायद्यानुसार समन्यायी वाटप महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्र्राधिकरण अधिनियम २००५ मध्ये कलम ११(सी) अन्वये जलसंपदा प्रकल्प, उप खोरे व नदी खोऱ्यांमधील टंचाईच्या परिस्थितीत पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचे अधिकार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहिल्यास या कायद्यानुसार देखील पाणी द्यावे लागेल.प्रमुख धरणांतील साठाबीड-माजलगाव प्रकल्प - ० टक्के, मांजरा प्रकल्प- ० टक्के, उस्मानाबाद- निम्न तेरणा व सीना कोळेगाव- ० टक्के, नांदेड- निम्न मनार- ० टक्के, विष्णूपुरी- २४ टक्के, परभणी येलदरी प्रकल्प - टक्के, निम्न दुधना- ३० टक्के, औरंगाबाद- जायकवाडी- ६.२० टक्के.