शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘मास्क’सक्तीच्या नादात पुणेकर विसरले हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST

अतुल चिंचली लोकमत न्यूज नटेवर्क पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. हेल्मेटसक्तीचा नियमही लागू आहे. ...

अतुल चिंचली

लोकमत न्यूज नटेवर्क

पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. हेल्मेटसक्तीचा नियमही लागू आहे. मात्र मास्कसक्तीचा नियम पाळत असताना याकडे अनेक दुचाकीचालकांचे दुर्लक्ष झाले आहे. हेल्मेट नसल्याने गेल्या दहा दिवसांत तीन कोटी रुपयांची दंडवसुली शहरात झाली आहे.

शहरात सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघे फिरणे, आरसा नसणे, गाडीवर अवजड सामान घेऊन जाणे, नंबरप्लेट, हॉर्न अशा विविध कारणांसाठी पोलिसांकडून रस्त्यावर कारवाई केली जाते. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे.

हेल्मेटबाबतची सर्वात जास्त कारवाई सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून होत आहे. गेल्या दहा दिवसांत म्हणजेच १४ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ७१ हजार ४७३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३ कोटी ५७ लाख ३६ हजार ५०० दंड आकारण्यात आला आहे. सद्यस्थितीत नागरिक हेल्मेट न घालता वाहन चालवत आहेत. कॅमेऱ्यातून होणारी अदृश्य कारवाई त्यांच्या निदर्शनास आली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

या नागरिकांना कोणत्याही क्षणी रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडल्यावर पकडले जाते. त्या वेळी गाडीच्या नंबरवरून ऑनलाईन नोंदला गेलेला दंड दाखवला जातो. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही नागरिकांशी संवाद साधला असता एका दुचाकीवरच १५००, ३०००, ४५००, ६०००, ३५०० असा विनाहेल्मेट दंड आकारल्याचे सांगण्यात आले.

चौकट

हेल्मेट डोक्यावर का नसते?

हेल्मेटसक्ती असतानाही त्याचा वापर का केला जात नाही, या संदर्भात नागरिकांकडून पुढील उत्तरे मिळाली -

१) मी हेल्मेट वापरत नाही. कारण मी शहरातल्या शहरातच फिरतो.

२) माझ्या गाडीचा वेग ४० पेक्षा कमी असतो. त्यामुळे हेल्मेटची गरज वाटत नाही.

३) हेल्मेटमुळे डोक्यात कोंडा आणि मानदुखीचा त्रास होतो.

४) हेल्मेटमुळे डोक्याचे केस गळू लागतात.

५) मी लांबच्या प्रवासाला फक्त हेल्मेट वापरतो. शहरात गरज वाटत नाही.

चौकट

“हेल्मेट नसल्याने माझा जवळचा मित्र अपघातात गेला. त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. हेल्मेट जवळ बाळगण्यासाठी थोडी गैरसोय होते, पण जिवासाठी तेवढे करण्यास मी तयार आहे.”

-अच्युत निफाडकर

चौकट

दंडासाठी नव्हे स्वत:साठी

“शहरात मागच्या वर्षी अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दुचाकीवरून झालेल्या ८० नागरिकांपैकी ७३ नागरिकांनी हेल्मेट घातले नव्हते. वाहतुकीच्या नियमानुसार हेल्मेट गरजेचे आहे. नागरिकांनी दंडासाठी नव्हे तर स्वरक्षणासाठी हेल्मेट घालावे.”

-राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे