शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

‘मास्क’सक्तीच्या नादात पुणेकर विसरले हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST

अतुल चिंचली लोकमत न्यूज नटेवर्क पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. हेल्मेटसक्तीचा नियमही लागू आहे. ...

अतुल चिंचली

लोकमत न्यूज नटेवर्क

पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. हेल्मेटसक्तीचा नियमही लागू आहे. मात्र मास्कसक्तीचा नियम पाळत असताना याकडे अनेक दुचाकीचालकांचे दुर्लक्ष झाले आहे. हेल्मेट नसल्याने गेल्या दहा दिवसांत तीन कोटी रुपयांची दंडवसुली शहरात झाली आहे.

शहरात सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघे फिरणे, आरसा नसणे, गाडीवर अवजड सामान घेऊन जाणे, नंबरप्लेट, हॉर्न अशा विविध कारणांसाठी पोलिसांकडून रस्त्यावर कारवाई केली जाते. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे.

हेल्मेटबाबतची सर्वात जास्त कारवाई सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून होत आहे. गेल्या दहा दिवसांत म्हणजेच १४ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ७१ हजार ४७३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३ कोटी ५७ लाख ३६ हजार ५०० दंड आकारण्यात आला आहे. सद्यस्थितीत नागरिक हेल्मेट न घालता वाहन चालवत आहेत. कॅमेऱ्यातून होणारी अदृश्य कारवाई त्यांच्या निदर्शनास आली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

या नागरिकांना कोणत्याही क्षणी रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडल्यावर पकडले जाते. त्या वेळी गाडीच्या नंबरवरून ऑनलाईन नोंदला गेलेला दंड दाखवला जातो. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही नागरिकांशी संवाद साधला असता एका दुचाकीवरच १५००, ३०००, ४५००, ६०००, ३५०० असा विनाहेल्मेट दंड आकारल्याचे सांगण्यात आले.

चौकट

हेल्मेट डोक्यावर का नसते?

हेल्मेटसक्ती असतानाही त्याचा वापर का केला जात नाही, या संदर्भात नागरिकांकडून पुढील उत्तरे मिळाली -

१) मी हेल्मेट वापरत नाही. कारण मी शहरातल्या शहरातच फिरतो.

२) माझ्या गाडीचा वेग ४० पेक्षा कमी असतो. त्यामुळे हेल्मेटची गरज वाटत नाही.

३) हेल्मेटमुळे डोक्यात कोंडा आणि मानदुखीचा त्रास होतो.

४) हेल्मेटमुळे डोक्याचे केस गळू लागतात.

५) मी लांबच्या प्रवासाला फक्त हेल्मेट वापरतो. शहरात गरज वाटत नाही.

चौकट

“हेल्मेट नसल्याने माझा जवळचा मित्र अपघातात गेला. त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. हेल्मेट जवळ बाळगण्यासाठी थोडी गैरसोय होते, पण जिवासाठी तेवढे करण्यास मी तयार आहे.”

-अच्युत निफाडकर

चौकट

दंडासाठी नव्हे स्वत:साठी

“शहरात मागच्या वर्षी अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दुचाकीवरून झालेल्या ८० नागरिकांपैकी ७३ नागरिकांनी हेल्मेट घातले नव्हते. वाहतुकीच्या नियमानुसार हेल्मेट गरजेचे आहे. नागरिकांनी दंडासाठी नव्हे तर स्वरक्षणासाठी हेल्मेट घालावे.”

-राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे