शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

हेल्मेट न घालणे पुणेकरांना पडले महागात

By admin | Updated: January 3, 2016 04:46 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे सूतोवाच केले असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी नुकतेच दिले आहेत. यामुळे हेल्मेटसक्तीचा

पुणे : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे सूतोवाच केले असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी नुकतेच दिले आहेत. यामुळे हेल्मेटसक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात हेल्मेट न घालणाऱ्या तब्बल ३ लाख ८ हजार ५६५ वाहनचालकांवर कारवाई करीत ३ कोटी १३ लाख ४६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत हेल्मेट कारवाईत वसूल करण्यात आलेला आजवरचा हा सर्वात मोठा दंड आहे. पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या संख्येत भरमसाट वाढ होत चालली आहे. यासोबतच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. वर्षाला साधारणपणे ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला आहे. गेल्या वर्षभरात हेल्मेट आणि ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या विशेष मोहिमा घेऊन वाहतूक पोलिसांनी जोरदार दंडवसुली केली आहे.हेल्मेट आणि वाद हे पुण्यातले एकप्रकारचे समीकरण झालेले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यापासून सुरू झालेले हेल्मेटसक्ती राबविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. परंतु वेळोवेळी झालेली सक्ती पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी आंदोलनांद्वारे हाणून पाडली. हेल्मेटसक्तीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी एक मध्यम मार्ग काढला. कोणताही वाहतूक नियमभंग केल्यास त्याच्यासोबत हेल्मेट कारवाई केली जाऊ लागली. ती अद्याप सुरू आहे. दिवाकर रावते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांना बळ मिळाले असून यापुढे हेल्मेट कारवाया आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये हेल्मेटवरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत.जनजागृतीसाठी ‘हेल्मेट पुणे’ची स्थापनाआजच्या धकाधकीच्या आणि गर्दीच्या जमान्यात सुरक्षित जीवनासाठी हेल्मेट वापरणे अतिशय गरजेचे आणि उपयुक्त आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने सक्ती करून हेल्मेट वापरण्यापेक्षा स्वेच्छेने हेल्मेटचा वापर केला पाहिजे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेतली, तर हेल्मेट नसल्याने अनेकांचे जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येकाने हेल्मेट वापरावे व आपले जीवन सुरक्षितपणे जगावे, यासाठी ‘हेल्मेट पुणे’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून हेल्मेट वापराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रदीप निफाडकर आणि अनिल मंद्रुपकर यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.पुण्यातही हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काहींनी त्याला विरोध केल्याने ते होऊ शकले नाही. हेल्मेट घातलेली व्यक्ती कितीही मोठ्या अपघातातून बचावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने हेल्मेट परिधान करायला हवे. ‘हेल्मेट पुणे सुरक्षित पुणे’ हा नारा घेऊन नवीन वर्षात हेल्मेट पुणे ही संस्था हेल्मेटबाबत जनजागृती करणार आहे. या उपक्रमात संस्था, व्यक्ती, पोलीस सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन निफाडकर व मंद्रुपकर यांनी केले आहे. पथनाट्य, प्रदर्शने, पत्रके, आदी माध्यमातून केली जाणार आहे.वर्षाला चारशेच्या आसपास होणाऱ्या प्राणांतिक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्येही हेल्मेट न घालणाऱ्या अनेकांना प्राण गमवावे लागतात. विशेष म्हणजे या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हेल्मेट घालण्याचा आमचा आग्रह कायदा म्हणून तर आहेच; परंतु काळजी म्हणूनही आहे. हेल्मेट कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. - सारंग आवाड, उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखाहेल्मेट न वापरल्याने अपघात होऊन कायमचे अपंगत्व येते अथवा रुग्ण दीर्घ काळासाठी बेशुद्धावस्थेत जाण्याचे प्रकार घडतात. हॉस्पिटलमध्ये दर दिवशी ३ ते ५ रुग्ण लहान-मोठी दुखापत झाल्याने दाखल होतात. काही दुखापती गंभीर असतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर अपरिहार्य आहे. हेल्मेट घातल्याने केस गळतात, मणक्याचे दुखणे उद्भवते, डोके दुखते असे चुकीचे समज लोकांमध्ये रुढ आहेत. हेल्मेट घातल्याने यापैकी कोणताही त्रास उद्भवत नाही. - डॉ. मंगेश उदारमित्राचा फोन आला म्हणून माझा मुलगा घाईघाईत घरातून बाहेर पडला. हेल्मेट न घालताच गाडीला किक मारून निघून गेला. काही वेळातच त्याचा अपघात झाल्याची बातमी समजली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अद्याप शुद्धीवर आलेला नाही. डॉक्टरही ‘सगळे ठीक होईल,’ असा दिलासा देत आहेत. तो हेल्मेट घालून गेला असता तर संसार उद्ध्वस्त होण्याची ही वेळ आली नसती. स्वत:चा आणि कुटुंबाचा विचार करून तरी सर्वांनी हेल्मेट वापरायला हवे, असे वाटते. - रुग्णाची आई