शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha 2024 : पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये वाढला मताचा टक्का; धक्का कुणाला?

By राजू हिंगे | Updated: November 22, 2024 08:56 IST

पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५२.९३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदान ९ टक्क्यांनी ...

पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५२.९३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदान ९ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार यावर बरेच काही अवलंबून आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा धक्का कोणाला बसतो, याचीही उत्सुकता लागली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सुनील कांबळे आणि महाविकास आघाडीचे रमेश बागवे यांच्यात थेट लढत झाली आहे.शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये कसबा पेठनंतर पुणे कॅन्टोन्मेंट हा कमी मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव मतदारसंघांपैकी एक असलेला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये कायमच चुरस पाहायला मिळाली आहे. या मतदारसंघात २०१९ साली ४३.४३ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र शहरातील आठ मतदारसंघात सर्वांत कमी मतदान होणारा पुणे कॅन्टोन्मेंटचा शिक्का मतदारांनी पुसला आहे. या निवडणुकीत १ लाख ५६ हजार ३५९ जणांनी मतदान केले आहे. त्यात पुरुष ८० हजार ३३५, तर महिला ७६ हजार ३२५ यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. १३ तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात ताडीवाला झोपडपट्टी, कासेवाडी, पत्राची चाळ, मंगळवार पेठ, पंचशीलनगर, डायस प्लॉट हा झोपडपट्टीचा भाग येतो. वानवडी, कोरेगाव पार्क, रास्तापेठ, सोमवार आणि मंगळवारपेठचा काही भाग या मतदारसंघात येतो. ताडीवाला झोपडपट्टीत ६७ हजार मतदार आहेत. संमिश्र भाग असलेल्या या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यात लाडक्या बहिणींचाही वाटा आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार यावर विजयांची गणिते ठरणार आहेत.

पंरपरा राखणार की इतिहास घडणार?

कॉंग्रेसचे रमेश बागवे यांनी २००९ मध्ये कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. दुसऱ्यांदा आमदार झालेल्या बागवे यांच्या गळ्यात गृहराज्यमंत्रिपदाची माळ पडली. परंतु २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपच्या दिलीप कांबळे यांच्याकडून बागवे यांना पराभव पत्करावा लागला. दिलीप कांबळे यांना राज्यमंत्री मंडळामध्ये समाज कल्याण विभागाचे राज्यमंत्रिपदही मिळाले होते. २०१९च्या निवडणुकीत सुनील कांबळे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीला वेगळा चेहरा निवडून आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा मतदारसंघ निवडणुकीची परंपरा राखणार की इतिहास घडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.