शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

हिंदी विभागाचे दरवाजे इतर विषयांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:51 IST

जगभर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाकडून मात्र इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

पुणे : जगभर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाकडून मात्र इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. हिंदी विभागातील प्रवेशाच्या १२० पैकी ४४ जागा रिक्त राहिल्या असतानाही तिथे इतर विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आलेला आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेली जाहिरात व हिंदी विभागाचे जोडपत्र यामध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या एमए, एमएस्सी व एमकॉम आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या एमए प्रवेशाच्या जाहिरातीमध्ये मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, संस्कृत आणि एज्युकेशन आदी विषयांमध्ये एमए करायचे असेल तर आर्ट, कॉमर्स व सायन्स शाखेच्या कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार एमएसाठी वेगवेगळ्या शाखांच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.संबंधित विभागांमध्ये प्रवेश देताना मूळ विषयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र मूळ विषयाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी कमी आल्यास इतर विषयातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. हिंदी विभाग मात्र या नियमाला अपवाद ठरले आहे. केवळ हिंदी मूळ विषय असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी हिंदी विभागाच्या जाहिरातीचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र विद्यापीठाच्या जाहिरातीनुसार कोणत्याही शाखेच्या पदवीधराला प्रवेश घेता येईल, असे म्हणण्यात आले आहे. याबाबत हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले, ‘‘जाहिरात देताना हिंदी विभागातील प्रवेशासाठी मूळ विषय हिंदी असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे, त्यानुसार प्रवेशाची कार्यवाही केली जात आहे.’’आंतरविद्याशाखीय अभ्यास व संशोधन होण्याची आवश्यकता तज्ज्ञ अभ्यासकांकडून व्यक्त केली जात असताना केवळ हिंदी विभागाने इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करणे चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठ अनुुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांकडून प्रवेशाची कार्यवाही पार पाडली जाते. मात्र हिंदी विभागाने घेतलेली भूमिका ही त्याला छेद देणारी असल्याने कुलगुरूंकडे दाद मागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.