शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

हिंदी विभागाचे दरवाजे इतर विषयांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:51 IST

जगभर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाकडून मात्र इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

पुणे : जगभर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाकडून मात्र इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. हिंदी विभागातील प्रवेशाच्या १२० पैकी ४४ जागा रिक्त राहिल्या असतानाही तिथे इतर विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आलेला आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेली जाहिरात व हिंदी विभागाचे जोडपत्र यामध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या एमए, एमएस्सी व एमकॉम आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या एमए प्रवेशाच्या जाहिरातीमध्ये मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, संस्कृत आणि एज्युकेशन आदी विषयांमध्ये एमए करायचे असेल तर आर्ट, कॉमर्स व सायन्स शाखेच्या कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार एमएसाठी वेगवेगळ्या शाखांच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.संबंधित विभागांमध्ये प्रवेश देताना मूळ विषयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र मूळ विषयाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी कमी आल्यास इतर विषयातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. हिंदी विभाग मात्र या नियमाला अपवाद ठरले आहे. केवळ हिंदी मूळ विषय असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी हिंदी विभागाच्या जाहिरातीचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र विद्यापीठाच्या जाहिरातीनुसार कोणत्याही शाखेच्या पदवीधराला प्रवेश घेता येईल, असे म्हणण्यात आले आहे. याबाबत हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी सांगितले, ‘‘जाहिरात देताना हिंदी विभागातील प्रवेशासाठी मूळ विषय हिंदी असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे, त्यानुसार प्रवेशाची कार्यवाही केली जात आहे.’’आंतरविद्याशाखीय अभ्यास व संशोधन होण्याची आवश्यकता तज्ज्ञ अभ्यासकांकडून व्यक्त केली जात असताना केवळ हिंदी विभागाने इतर विषयांसाठी प्रवेशाचे दरवाजे बंद करणे चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठ अनुुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांकडून प्रवेशाची कार्यवाही पार पाडली जाते. मात्र हिंदी विभागाने घेतलेली भूमिका ही त्याला छेद देणारी असल्याने कुलगुरूंकडे दाद मागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.