शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

पुणेकरांमध्ये वाहतूक निरक्षरताच

By admin | Updated: October 6, 2016 03:58 IST

शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून

पुणे : शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून, पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला असून, गेल्या १० महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या ९ लाख ६९ हजार कारवायांमध्ये तब्बल ११ कोटी ६० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी डिसेंबरअखेरपर्यंत १० कोटींचा दंड वसूल होण्याची शक्यता आहे.वाहतूक पोलिसांनी गुरुवारी १०० किलोमीटरची मानवी साखळी, पथनाट्ये यांद्वारे जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागामधून वाहतुकीचे साधेसाधे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. वर्षभर विविध मोहिमा, उपक्रम आणि जनजागृतिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते. परंतु, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत चालल्याचे एकंदरीत चित्र आहे. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासीनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालविणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग, वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीला अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालक करतात.किरकोळ स्वरूपाच्या वाटणाऱ्या चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रियांच्या बाबतीतही ही संवेदनशीलता दिसत नाही. वेडीवाकडी वाहने चालविणे, मध्येच वाहन घालणे, रस्त्यावर वेडीवाकडी वाहने उभी करणे, दोन वाहनांमधून मार्ग काढत जाणे, लेनची शिस्त न पाळणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर, चिंचोळ्या आणि अरुंद रस्त्यांवरचे बेकायदा पार्किंग, व्यावसायिकांनी खाऊन टाकलेले इमारतींचे पार्किंग यामुळे रस्त्यांवरच्या अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. (प्रतिनिधी)