शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पुणेकरांमध्ये वाहतूक निरक्षरताच

By admin | Updated: October 6, 2016 03:58 IST

शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून

पुणे : शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून, पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला असून, गेल्या १० महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या ९ लाख ६९ हजार कारवायांमध्ये तब्बल ११ कोटी ६० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी डिसेंबरअखेरपर्यंत १० कोटींचा दंड वसूल होण्याची शक्यता आहे.वाहतूक पोलिसांनी गुरुवारी १०० किलोमीटरची मानवी साखळी, पथनाट्ये यांद्वारे जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागामधून वाहतुकीचे साधेसाधे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. वर्षभर विविध मोहिमा, उपक्रम आणि जनजागृतिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते. परंतु, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत चालल्याचे एकंदरीत चित्र आहे. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासीनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालविणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग, वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीला अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालक करतात.किरकोळ स्वरूपाच्या वाटणाऱ्या चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रियांच्या बाबतीतही ही संवेदनशीलता दिसत नाही. वेडीवाकडी वाहने चालविणे, मध्येच वाहन घालणे, रस्त्यावर वेडीवाकडी वाहने उभी करणे, दोन वाहनांमधून मार्ग काढत जाणे, लेनची शिस्त न पाळणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर, चिंचोळ्या आणि अरुंद रस्त्यांवरचे बेकायदा पार्किंग, व्यावसायिकांनी खाऊन टाकलेले इमारतींचे पार्किंग यामुळे रस्त्यांवरच्या अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. (प्रतिनिधी)