शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्ग जाम

By admin | Updated: March 19, 2017 03:50 IST

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर मार्केटयार्ड ते चांडोलीदरम्यान बंद पडलेल्या वाहनांमुळे सकाळी १० वाजल्यापासून जवळपास दिवसभर वाहतूककोंडी झाली

काळूस-शिरोली : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर मार्केटयार्ड ते चांडोलीदरम्यान बंद पडलेल्या वाहनांमुळे सकाळी १० वाजल्यापासून जवळपास दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. लग्नसराई आणि बंद पडलेल्या वाहनांच्या मालिकेमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. राजगुरुनगर शहराजवळ पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी नित्याचाच विषय बनला आहे. मात्र शनिवारी या एकामागून एक बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीने कहरच केला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँडसमोरील पुलावर एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली. त्यानंतर मार्केट यार्डसमोरही एक कंटेनर बंद पडला. पोलीस ठाण्याजवळील पुलावर आयशर टेम्पो राजगुरुनगर सहकारी बँकेसमोर पीएमटी व चांडोली येथेही एक १० चाकी गाडी बंद पडली. ही वाहने एकामागून एक बंद पडल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यातच शनिवारी लग्नाची तिथी असल्याने या भागात असणाऱ्या ८ ते १० लग्नकार्यामुळे वऱ्हाडी मंडळींच्या वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडली. सलग बंद पडलेली वाहने पुलावरील अरुंद रस्ता, लग्नाची तारीख यामुळे वाहतूककोंडी अक्षरश: असह्य असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. कोंडी एवढी जास्त होती, की पुण्याकडून येणाऱ्या राजगुरुनगरच्या प्रवासी, विद्यार्थी तसेच पहिल्या पाळीवरून सुटलेल्या कंपनी कामगारांनी अडीच ते तीन किलोमीटर पायी जाणेच पसंत केले. साधारण १ किलोमीटर वाहन पुढे जाण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास वेळ लागत होता.खेडच्या दोन्ही बाजूस ८ ते १० किलोमीटरपर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेड पोलिसांनी वाहतूककोंडी हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही सलग बंद पडत गेलेल्या वाहनांमुळे पोलिसांचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे दिसत होते. राजगुरुनगरजवळील कोंडी कधी फुटणार ? राजगुरुनगरजवळील वाहतूककोंडी नित्याचीच आहे. कोंडीवर बाह्यवळण मार्ग तसेच केदारेश्वर पूल हे पर्याय आहेत, मात्र हे पर्याय उपलब्ध होण्यासाठी दीड-दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या भागातील लग्नकार्यालये रस्त्याकडेची अनधिकृत व्यावसायिक बांधकामे तसेच बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळेही वाहतूककोंडीत भर पडत आहे. यावरही उपाय होणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.