शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

स्पशेल रिपोर्ट: भूजल पातळीत पुणे ठरले उणे, आकडेवारीतून उघड; जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 12:19 IST

पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत जाणार आहे, असे भूजल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे....

पुणे : दिवसेंदिवस पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुणे जिल्ह्यातील भूजलाची पातळी अधिकच खालावत चालली आहे. एकीकडे समाधानकारक पाऊस नाही आणि दुसरीकडे उपसा माेठ्या प्रमाणावर वाढलेला. त्यामुळे परिणामी १३ तालुक्यांत भूजलाची पातळी उणे झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत जाणार आहे, असे भूजल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

राज्यातील भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून, अनेक तालुक्यांत दुष्काळी स्थिती गंभीर बनत आहे. भूजल विभागाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये तालुक्यातील भूजलाच्या पातळीचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनेक तालुक्यांतील भूजल पातळी खालावल्याचे समोर आले आहे. त्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे.

अहवाल काय सांगताे?

- जानेवारी महिन्यात आंबेगाव तालुक्यामध्ये पाणीपातळी प्लस होती. ती आता उणे झाली आहे. पावसाळ्यात झालेला अपुरा पाऊस आणि पाण्याचा वाढता उपसा यामुळे पुणे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी चार ते पाच फुटांहून अधिक घट झाली आहे.

- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १३ पैकी १३ तालुक्यांमधील पाणीपातळीत मार्च महिन्यात ०.०१ ते ०.८४ फूट इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे.

जुन्नरला सर्वाधिक संकट !

यंदा जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ८.४४ फुटांनी पाणीपातळी खालावली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत राज्यातील सर्व तालुक्यांमधील भूजल पातळीच्या नोंदी सातत्याने घेतल्या जातात. या नोंदींतून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूजल पातळीत झालेली वाढ, तसेच घट समजते. शिरूर, पुरंदर, इंदापूर, हवेली, दौंड, बारामती, आंबेगाव या ठिकाणची पाणीपातळी देखील इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक खालावली आहे.

कशा करतात नोंदी? :

भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रात तीन निरीक्षण विहिरी याप्रमाणे जिल्ह्यात १९२ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. यामध्ये ७१ कूपनलिका समाविष्ट आहेत. यातील पाण्याचा उपसा करण्यात येत नाही. भूजल विभागाने मार्च महिन्यात घेतलेल्या नोंदींचा अभ्यास करून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यातून जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

तालुकानिहाय पाणीपातळीतील घट (प्रमाण-फूट)

तालुका - सरासरी मार्चची- मार्च २०२४ - घट

आंबेगाव - ४.९३ - ५.१६ - उणे ०.२३

बारामती - ६.०२ - ६.४१ - उणे ०.३९

भोर - ३.३९ - ४.११ - उणे ०.७२

दौंड - ५.९१ - ६.२८ - उणे ०.३८

हवेली - ५.५६ - ५.७० - उणे ०.१४

इंदापूर - ६.४२ - ६.६० - उणे ०.१७

जुन्नर - ८.३७ - ८.४४ - उणे ०.०७

खेड - ४.७३ - ४.७४ - उणे ०.०१

मावळ - २.२६ - २.६१- उणे ०.३५

मुळशी - २.८१ - ३.४३ - उणे ०.६२

पुरंदर - ६.९७ - ७.०२ - उणे ०.०६

शिरूर - ६.२५ - ७.०९ - उणे ०.८४

वेल्हा - ३.५० - ४.२५ - उणे ०.७५

राज्यातील ३५३ तालुक्यांचा अहवाल :

भूजल विभागाने राज्यातील ३५३ तालुक्यांमधील भूजलाच्या नोंदी घेतल्या गेल्या. त्यात ३२६ तालुक्यांमध्ये सर्वसाधारणपणे पाणीपातळी खालावलेली असल्याचे दिसून आले आहे. तर २७ तालुक्यांना दुष्काळाचा अधिक फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यामधील १० तालुक्यांना; तर उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांतील ४ तालुक्यांना सर्वाधिक झळ बसत आहे.

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे भूजल साठा कमी झाला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात पाण्याचा उपसा सर्वाधिक होत आहे. भूजल पुनर्भरण मात्र त्याप्रमाणात होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे.

- उपेंद्र धोंडे, भूवैज्ञानिक, जलशक्ती मंत्रालय

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे