शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा कचरा ग्रामीण भागात

By admin | Updated: July 28, 2015 00:38 IST

पुणे शहराची ‘कचराकोंडी’ अद्यापही सुटली नसल्याने महापालिका आता हा कचरा शेतकऱ्यांना देत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३00 शेतकरी हा करचा घेत आहेत

यवत : पुणे शहराची ‘कचराकोंडी’ अद्यापही सुटली नसल्याने महापालिका आता हा कचरा शेतकऱ्यांना देत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३00 शेतकरी हा करचा घेत आहेत. मात्र, तो गाडला जात नसल्याने त्या परिसरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. दौैंड तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल बन डाळिंब येथील लालवाडी परिसरात हा कचरा टाकला जात आहे. मात्र, येथे दुर्गंधी व माश्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या डाळिंबमध्ये कचरा टाकला जात असताना स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करूनदेखील कचरा टाकणे सुरूच होते. आषाढी एकादशी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवस कचऱ्याच्या गाड्या बंद असल्याचे सरपंच मंगल सुतार यांनी सांगितले. डाळिंब ग्रामपंचायत प्रशासन परिसरात कचरा टाकण्याच्या विरोधात आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महानगरपालिका व आरोग्य विभागाशी आम्ही पत्रव्यवहार करणार असल्याचे देखील सरपंच मंगल सुतार यांनी सांगितले. प्रचंड दुर्गंधी येत असलेला ओला कचरा डाळिंब परिसरात टाकण्यात सुरुवात झाली आहे. अचानक खासगी मालकी असलेल्या एका माळरानात हा कचरा टाकण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण बनले आहे. तरकारीची शेती आहे तशीच सोडून देण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, मागील काही दिवसांत कचरा तसाच पडून आहे. खासगी मालकी असलेल्या माळरानात कचरा टाकला जात असला तरी याचा त्रास अनेक सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना होत आहे. हा कचरा उचलून कचरा टाकणे बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. (वार्ताहर)मुळात शहरातील कचरा ग्रामीण भागात टाकू नये, अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यानी त्यांचा कचरा शहरातच जिरवावा. विनाकारण ग्रामीण भागातील जनतेला त्रास देव नये. फक्त ओला कचरा टाकणार असे महापालिकेने सांगितले होते. या कचाऱ्यामुळे जर ग्रामस्थांना त्रास होत असेल तर तसा जाब महापालिकेला विचारू.- प्रदीप कंद , अध्यक्ष, जिल्हा परिषद