शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पुण्याच्या पाण्यात कपात नाही

By admin | Updated: May 5, 2016 04:35 IST

पुणे शहरातून प्रचंड राजकीय विरोध असतानाही खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी एक वाजता दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या वेळी धरण

पुणे : पुणे शहरातून प्रचंड राजकीय विरोध असतानाही खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी एक वाजता दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या वेळी धरण परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पाणी सोडण्याच्या निर्णयावरून सर्व राजकीय पक्षांकडून पालक मंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य करण्यात येत असताना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व जबाबदारी आपल्यावर घेतली असून, आपणच हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. कालव्यात ६०० क्युसेक्सने नवी मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पाण्याची चोरी व कालवा फोडण्यासारखा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कालवा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल १५० पेक्षा अधिक विद्युत मोटारी जप्त करून कालव्यातून पाण्याचा विर्सग सुरू असेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे दोन दिवसांपासून शहरात राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व मनेसे यांनी बापट यांच्यावर तीव्र टीका केली होती. आजही शिवसेनेच्या वतीने कसबा गणपतीची आरती करून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. कॉँग्रेसच्य वतीने या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पाणी सोडल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पाटबंधारे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतील. या वेळी राव म्हणाले, ‘‘खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर या शहरांना पाणी सोडण्यासाठी १५ दिवसांपासून नियमित आढावा बैठका घेण्यात आला. बापट यांनीदेखील शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कालवा, नवीन बंद पाईपलाईन यांची पाहणी केली. दौंड, इंदापूर तालुक्यांत टँकर भरण्याचे स्रोतदेखील आटल्यामुळे येथील तब्बल पावणेचार लाख लोक व एक लाख ७५ हजार लहान-मोठ्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एक मे रोजी खडकवासला प्रकल्पातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरासाठी नवीन बंद पाईपलाईनमुळे दर महिन्याला ०.१० टीएमसी पाणी बचत होणार असून, त्यामुळे पहिल्यादा मृत साठादेखील उचलता येईल. यामुळे पुणे शहरात पाणीकपात न करता दौंड व इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे.’’ १९ मेपर्यंत विसर्ग सुरू राहणारदौंड, इंदापूरसाठी खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी १ पासून ६०० क्युसेक्सन एक टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असून, सुमारे १,१०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येईल. हे पाणी २२० किलोमीटरचा प्रवास करून इंदापूर येथील शेवटच्या तरंगवाडी तलावात पोहोचण्यासाठी १२ ते १३ दिवस लागणार आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून १९ मेपर्यंत विसर्ग सोडण्यात येणार आहे.