शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

लाचखोर पकडण्यात पुणे विभाग अव्वल

By admin | Updated: May 6, 2015 06:24 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने जानेवारी पासून आजपर्यंत ७९ सापळे रचले असून एकूण १०६ जणांवर ८१ गुन्हे नोंदविण्यात आले. राज्यात सापळे रचण्यात पहिल्या क्रमांंकावर हा विभाग आहे

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने जानेवारी पासून आजपर्यंत ७९ सापळे रचले असून एकूण १०६ जणांवर ८१ गुन्हे नोंदविण्यात आले. राज्यात सापळे रचण्यात पहिल्या क्रमांंकावर हा विभाग आहे, अशी माहिती या विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली.या ७९ जणांमध्ये ७ जण पहिल्या वर्गातील तर ८ जण दुस-या दर्जाचे अधिकारी असून ६२ जण तिस-या वर्गाचे कर्मचारी आहेत. ३ चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. २० खासगी व्यक्ती सरकारी कर्मचा-यांसाठी लाच स्विकारताना पकडल्या गेल्या. एकूण १०६ जणांवर ८१ गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत १२ लाख ८०हजार रुपये जप्त करण्यात आले असून महसूल खाते व पोलीस दलातील प्रत्येकी २८ जणांचा लाचखोरांत समावेश आहे. या सापळ्यांपैकी पुण्यात ३१साता-यात ११ सांगली जिल्ह्यात १२ सोलापूरात १६ तर कोल्हापूरमध्ये ९ रचले गेले. १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्याच्या आवाहनाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असून ४६ तक्रारी याव्दारे करण्यात आल्या. पुणे विभागात ६ तक्रारी आल्या असे सांगून प्रधान म्हणाले थेट अधिका-यांच्या मोबाईलवर, अ‍ॅपवर तक्रारी केल्या जातात, त्यांची दखल घेतली जाते. तक्रारदाराला कार्यालयात न बोलाविता थेट कारवाई सुध्दा केली जात आहे,असे प्रधान यांनी नमूद केले. अ‍ॅपवरुन आलेल्या तक्रारीवरुन कोल्हापूरला आरटीओ इन्स्पेक्टरवर कारवाई करण्यात आल्याची पुस्ती त्यांनी जोडली. तक्रारदाराचे नाव पुढे येत नाही, त्याला संरक्षण दिले जाते. नंतरही त्याला काही त्रास होत आहे का हे तपासण्यासाठी बोलावले जाते, असे सांगून प्रधान म्हणाले पुणे विभागात ४१ जणांची तर राज्यात ३४५जणांची खुली चौकशी सुरु करण्यात येत आहे. राज्यात जानेवारीपासून ५३८ जणांना पकडण्यात आले. त्यातील ७८ जण एजंट असून २७ जण पहिल्या वर्गातील, ६० जण दुस-या दर्जाचे अधिकारी असून जण तिस-या वर्गातील ३८८ जण तर चवथ्या वर्गातील १८ जण आहेत. लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी का आहे यावर या विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान म्हणाले की ज्या न्यायालयांत हे खटले चालतात, त्या न्यायाधीशांना सापळे कसे रचले जातात आदी तांत्रिक मुद्यांचे प्रशिक्षण नसल्याने आरोपी निर्दोष होतात. काहीदा जुन्या खटल्यांत तक्रारदार हजर होत नाहीत. त्यातच जुन्या खटल्यांची प्रलंबितता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालये कमी करत आहेत.