शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पैसेवाटपात पुणे जिल्ह्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाॅकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे समाजातील दुर्बल व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लाॅकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे समाजातील दुर्बल व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी महाआघाडी सरकारने सामाजिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील तब्बल ८७ हजार ३८१ लाभार्थ्यांसाठी २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. सोमवार (दि.३) पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली. दरम्यान या योजनेनुसार पैसे वाटप करण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे.

कोरोना संकटामुळे परिस्थिती लक्षात घेऊन २०२१-२२ या वर्षामध्ये आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इत्यादी योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीचे अर्थसाहाय्य एकत्रितपणे वितरण करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत येणाऱ्या सामाजिक व विशेष अर्थसाहाय्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले रुपये २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयांचे अनुदान १४ तालुक्यांना वितरीत केले.

दुर्बल घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा

वर नमूद सर्व योजनेतील समाविष्ट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील तसेच २१ हजारांच्या आत उत्पन्न असणारे दिव्यांग, निराधार, परितक्त्या, विधवा, घटस्फोटित, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी इत्यादी सर्व दुर्बल घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळणार आहे. ही रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू

लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर तत्काळ रकमा जमा करण्याबाबतची तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु आहे. लाभार्थ्यांनी बँकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून कोविड १९ च्या उपाययोजनांबाबतच्या अटी व शर्तींचे पालन करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.