शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुणे व्यापारी महासंघाचा संचारबंदीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनामुळे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांवर आर्थिकदृष्टया वाईट परिणाम झाले आहेत. सरकारने आधी रात्री आठ नंतर संचारबंदी लागू केली. ...

पुणे : कोरोनामुळे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांवर आर्थिकदृष्टया वाईट परिणाम झाले आहेत. सरकारने आधी रात्री आठ नंतर संचारबंदी लागू केली. त्यावेळी व्यापारी संघाने समजुतदारपणाची भूमिका घेतली. मात्र, पुन्हा व्यवसायाच्या वेळा कमी करण्यात आल्याने त्याचा फटका बसणार आहे. पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले, “आधीच्या निर्णयावर पुणे व्यापारी महासंघाने एक तास वेळ वाढवून मागितली होती. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर नवीन नियमावली जाहीर करण्याआधी प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी बोलणे आवश्यक होते. व्यापारी आणि जनतेची मते विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला. सकाळी सहा वाजता दुकाने उघडणे अशक्य आहे. व्यापारी वर्गात महिला कर्मचारी वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी सहाच्या आत घरातील कामे आवरून येणे अवघड होणार आहे. तसेच एवढ्या सकाळी प्रवास करणे नोकरदारवर्ग आणि महिलांसाठी कठीण आहे.”

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून अजूनही व्यापारी वर्ग सावरलेला नाही. त्यांच्या डोक्यावर असणारे कर्ज वाढत चालले आहे. व्यापाऱ्यांना कर्जाबाबत कुठल्याही प्रकारची सूट दिली नाही. त्यांनी सर्व कर भरून आपल्या दुकानातील कर्मचारी वर्गाला पगार देणेही बंधनकारक केले आहे. सकाळी अकराशिवाय बाजार उघडत नाही. तेच सायंकाळी पाच वाजता बंद करावे लागणार आहे. सहा तासाच्या व्यवसायात व्यापारी नोकरांचा पगार, स्वत:चा व्यवसाय, नियम, अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष कसे देणार असा सवाल रांका यांनी उपस्थित केला. कामगारांना महिन्याचे पगार दिले नाहीतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार याचा सरकारने विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

चौकट

गुढीपाडव्याच्या उत्साहावर विरजण

“महाराष्ट्रात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. येत्या १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. नव वर्षाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सरकार कुठल्या आधारावर हे निष्कर्ष काढते की दिवसा कोरोना होणार नाही. सायंकाळी फिरल्यानंतर कोरोना होतो असे शासनाला वाटते काय? सरकारने जनतेचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन संचारबंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा. सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत दुकाने खुले ठेवण्याची परवानगी द्यावी.”

-फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ