शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पुणे व्यापारी महासंघाचा संचारबंदीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनामुळे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांवर आर्थिकदृष्टया वाईट परिणाम झाले आहेत. सरकारने आधी रात्री आठ नंतर संचारबंदी लागू केली. ...

पुणे : कोरोनामुळे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांवर आर्थिकदृष्टया वाईट परिणाम झाले आहेत. सरकारने आधी रात्री आठ नंतर संचारबंदी लागू केली. त्यावेळी व्यापारी संघाने समजुतदारपणाची भूमिका घेतली. मात्र, पुन्हा व्यवसायाच्या वेळा कमी करण्यात आल्याने त्याचा फटका बसणार आहे. पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले, “आधीच्या निर्णयावर पुणे व्यापारी महासंघाने एक तास वेळ वाढवून मागितली होती. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर नवीन नियमावली जाहीर करण्याआधी प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी बोलणे आवश्यक होते. व्यापारी आणि जनतेची मते विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला. सकाळी सहा वाजता दुकाने उघडणे अशक्य आहे. व्यापारी वर्गात महिला कर्मचारी वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी सहाच्या आत घरातील कामे आवरून येणे अवघड होणार आहे. तसेच एवढ्या सकाळी प्रवास करणे नोकरदारवर्ग आणि महिलांसाठी कठीण आहे.”

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून अजूनही व्यापारी वर्ग सावरलेला नाही. त्यांच्या डोक्यावर असणारे कर्ज वाढत चालले आहे. व्यापाऱ्यांना कर्जाबाबत कुठल्याही प्रकारची सूट दिली नाही. त्यांनी सर्व कर भरून आपल्या दुकानातील कर्मचारी वर्गाला पगार देणेही बंधनकारक केले आहे. सकाळी अकराशिवाय बाजार उघडत नाही. तेच सायंकाळी पाच वाजता बंद करावे लागणार आहे. सहा तासाच्या व्यवसायात व्यापारी नोकरांचा पगार, स्वत:चा व्यवसाय, नियम, अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष कसे देणार असा सवाल रांका यांनी उपस्थित केला. कामगारांना महिन्याचे पगार दिले नाहीतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार याचा सरकारने विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

चौकट

गुढीपाडव्याच्या उत्साहावर विरजण

“महाराष्ट्रात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. येत्या १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. नव वर्षाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सरकार कुठल्या आधारावर हे निष्कर्ष काढते की दिवसा कोरोना होणार नाही. सायंकाळी फिरल्यानंतर कोरोना होतो असे शासनाला वाटते काय? सरकारने जनतेचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन संचारबंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा. सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत दुकाने खुले ठेवण्याची परवानगी द्यावी.”

-फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ