शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

पुण्याला मिळू शकते ३० टीएमसी पाणी

By admin | Updated: March 22, 2017 03:05 IST

पिण्याच्या भीषण पाणी टंचाईचा गतवर्षी सामना केल्यानंतरही पुण्यात पुन्हा यंदा पाणी दोन वेळा द्यायचे की एक वेळा यावरून राजकीय वाद सुरू आहेत.

राजू इनामदार / पुणेपिण्याच्या भीषण पाणी टंचाईचा गतवर्षी सामना केल्यानंतरही पुण्यात पुन्हा यंदा पाणी दोन वेळा द्यायचे की एक वेळा यावरून राजकीय वाद सुरू आहेत. मात्र या पाणी टंचाईवरूनच बोध घेऊन केंद्र सरकारच्या हैद्राबादस्थित नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी यांनी भविष्यातील पुण्याची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन तीन प्रकल्प अहवाल तयार केले आहेत, त्यावर साधी चर्चा करण्याचेही राजकारण्यांकडून टाळले जात आहे. यातील एका जरी प्रकल्पाची आजमितीस सुरूवात झाली तर पुढील १० वर्षात ते काम पुर्ण होऊन त्यातून किमान २५ ते ३० टीएमसी पाणी पुण्याला उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पुण्याला सध्या खडकवासला धरणसाखळीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सध्याची पुण्याची लोकसंख्या साधारण ३५ लाख आहे. पिण्याच्या पाण्याची रोजची गरज १२५० दशलक्षलीटर इतकी आहे. वार्षिक गरज १५ टीएमसी आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे. त्यात पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणातून पाणी साठा येत असतो. या चारही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता २९ टीएमसी इतकी आहे. पुणे शहराशिवाय या धरणांमधून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर अशी गावे यांनाही पाणी दिले जाते. शेतीसाठी वेळोवेळी आवर्तने सोडली जातात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुण्याला झगडावे लागते. त्यातून वाद निर्माण होतात.एखाद्या संस्थेच्या, किंवा सरकारी कार्यालयाच्या स्तरावर तयार झालेल्या प्रस्ताव किंवा प्रकल्पांना त्यांचा राजकीय स्तरावर विचार होत नाही तोपर्यंत फार महत्व दिले जात नाही. राजकीय स्तरावर विचार होईपर्यंत त्या प्रस्तावाची गरज संपून नव्याने प्रस्ताव तयार करण्याची वेळ येते. किमान पाण्याच्या प्रस्तावांबाबत तरी हा प्रकार होऊ नये असे अधिकाऱ्यांना वाटते. पुणे हे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर झाले आहे. भविष्यातील लोकसंख्या ५० लाखांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. या लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवायचे असेल तर या तिन्हीपैकी एका प्रकल्पाचा तरी आतापासूनच विचार करावा लागेल असे अधिकारी सांगतात. सध्या केंद्रापासून ते थेट महापालिकेतपर्यंत एकाच पक्षाची सत्ता आहे. त्यांनी मनावर घेतले तर या प्रकल्पांचा किमान विचार तरी करायला सुरूवात होऊ शकते असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.