शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पुण्याला मिळू शकते ३० टीएमसी पाणी

By admin | Updated: March 22, 2017 03:05 IST

पिण्याच्या भीषण पाणी टंचाईचा गतवर्षी सामना केल्यानंतरही पुण्यात पुन्हा यंदा पाणी दोन वेळा द्यायचे की एक वेळा यावरून राजकीय वाद सुरू आहेत.

राजू इनामदार / पुणेपिण्याच्या भीषण पाणी टंचाईचा गतवर्षी सामना केल्यानंतरही पुण्यात पुन्हा यंदा पाणी दोन वेळा द्यायचे की एक वेळा यावरून राजकीय वाद सुरू आहेत. मात्र या पाणी टंचाईवरूनच बोध घेऊन केंद्र सरकारच्या हैद्राबादस्थित नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी यांनी भविष्यातील पुण्याची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन तीन प्रकल्प अहवाल तयार केले आहेत, त्यावर साधी चर्चा करण्याचेही राजकारण्यांकडून टाळले जात आहे. यातील एका जरी प्रकल्पाची आजमितीस सुरूवात झाली तर पुढील १० वर्षात ते काम पुर्ण होऊन त्यातून किमान २५ ते ३० टीएमसी पाणी पुण्याला उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पुण्याला सध्या खडकवासला धरणसाखळीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सध्याची पुण्याची लोकसंख्या साधारण ३५ लाख आहे. पिण्याच्या पाण्याची रोजची गरज १२५० दशलक्षलीटर इतकी आहे. वार्षिक गरज १५ टीएमसी आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे. त्यात पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणातून पाणी साठा येत असतो. या चारही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता २९ टीएमसी इतकी आहे. पुणे शहराशिवाय या धरणांमधून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर अशी गावे यांनाही पाणी दिले जाते. शेतीसाठी वेळोवेळी आवर्तने सोडली जातात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुण्याला झगडावे लागते. त्यातून वाद निर्माण होतात.एखाद्या संस्थेच्या, किंवा सरकारी कार्यालयाच्या स्तरावर तयार झालेल्या प्रस्ताव किंवा प्रकल्पांना त्यांचा राजकीय स्तरावर विचार होत नाही तोपर्यंत फार महत्व दिले जात नाही. राजकीय स्तरावर विचार होईपर्यंत त्या प्रस्तावाची गरज संपून नव्याने प्रस्ताव तयार करण्याची वेळ येते. किमान पाण्याच्या प्रस्तावांबाबत तरी हा प्रकार होऊ नये असे अधिकाऱ्यांना वाटते. पुणे हे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर झाले आहे. भविष्यातील लोकसंख्या ५० लाखांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. या लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवायचे असेल तर या तिन्हीपैकी एका प्रकल्पाचा तरी आतापासूनच विचार करावा लागेल असे अधिकारी सांगतात. सध्या केंद्रापासून ते थेट महापालिकेतपर्यंत एकाच पक्षाची सत्ता आहे. त्यांनी मनावर घेतले तर या प्रकल्पांचा किमान विचार तरी करायला सुरूवात होऊ शकते असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.