शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

डाळींचा साठा मर्यादा २०० टनांवरून ५०० टनांपर्यंत वाढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

पुणे : केंद्र सरकारने डाळींचा साठा करण्यास मर्यादा घातल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासाठी शुकवारी (दि. १६) रोजी ...

पुणे : केंद्र सरकारने डाळींचा साठा करण्यास मर्यादा घातल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासाठी शुकवारी (दि. १६) रोजी संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात आला होता. त्याची दखल घेत केंद्र सरकारने २०० टनांपर्यंत दिलेली मर्यादा आता ५०० टनांपर्यंत वाढवल्याचे आदेश केंद्र सरकारचे संयुक्त सचिव अनुपम मिश्रा यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केंद्र सरकारने २ जुलै २०२१ रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली होती. या अध्यादेशाला व्यापारी आणि शेतकरी यांनी तीव्र विरोध केला होता. तसेच हा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यासाठी कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया तसेच दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) अध्यक्ष वालचंद संचेती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती.

केंद्र शासनाने ठोक विक्रेत्यांसाठी दोनशे टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टनांची मर्यादा टाकण्यात आली आहे. केंद्र शासनाने २०२० मध्ये कृषी विषयक तीन कायदे आणले होते. त्यापैकी एका कायद्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी अत्यावश्यक कायद्यातून मुक्त करून साठा मर्यादा रद्द केली होती. फक्त आपत्कालीन परिस्थितीत साठा मर्यादाबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, तसे काहीच न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. आता मात्र, केंद्र शासनाने ठोक विक्रेत्यांसाठी ५०० टन तर किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टनांची मर्यादा दिली आहे.