शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

डाळींचा साठा मर्यादा २०० टनांवरून ५०० टनांपर्यंत वाढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

पुणे : केंद्र सरकारने डाळींचा साठा करण्यास मर्यादा घातल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासाठी शुकवारी (दि. १६) रोजी ...

पुणे : केंद्र सरकारने डाळींचा साठा करण्यास मर्यादा घातल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासाठी शुकवारी (दि. १६) रोजी संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात आला होता. त्याची दखल घेत केंद्र सरकारने २०० टनांपर्यंत दिलेली मर्यादा आता ५०० टनांपर्यंत वाढवल्याचे आदेश केंद्र सरकारचे संयुक्त सचिव अनुपम मिश्रा यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केंद्र सरकारने २ जुलै २०२१ रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली होती. या अध्यादेशाला व्यापारी आणि शेतकरी यांनी तीव्र विरोध केला होता. तसेच हा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यासाठी कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया तसेच दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) अध्यक्ष वालचंद संचेती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती.

केंद्र शासनाने ठोक विक्रेत्यांसाठी दोनशे टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टनांची मर्यादा टाकण्यात आली आहे. केंद्र शासनाने २०२० मध्ये कृषी विषयक तीन कायदे आणले होते. त्यापैकी एका कायद्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी अत्यावश्यक कायद्यातून मुक्त करून साठा मर्यादा रद्द केली होती. फक्त आपत्कालीन परिस्थितीत साठा मर्यादाबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, तसे काहीच न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. आता मात्र, केंद्र शासनाने ठोक विक्रेत्यांसाठी ५०० टन तर किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच टनांची मर्यादा दिली आहे.