शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्या

By admin | Updated: March 6, 2016 01:06 IST

‘मेक इन इंडिया’चा अवलंब करताना उद्योगधंद्यांना कौशल्यप्राप्त मनुष्यबळ मिळत नसल्याने शिक्षण संस्थांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे

कोरेगाव भीमा : ‘मेक इन इंडिया’चा अवलंब करताना उद्योगधंद्यांना कौशल्यप्राप्त मनुष्यबळ मिळत नसल्याने शिक्षण संस्थांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना संधी निर्माण होऊन विकास घडू शकतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.सणसवाडी येथील एका खासगी कारखान्याच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून सणसवाडीतील श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या शालेय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबूराव पाचर्णे, सरपंच वर्षा कानडे, नरेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, युवराज दरेकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, जगाच्या पाठीवर भारताने वेगळा ठसा निर्माण केला आहे. देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये भारत हा आयात करणारा देश न राहता निर्यात करणारा देश म्हणून नावलौकिकाला यायला हवा. वस्तू भारतातच निर्मिती करून त्यांची परदेशात निर्यात झाल्यास ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने सफल होईल. सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, सरपंच वर्षा कानडे, उपसरपंच युवराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य बाबा दरेकर आदींनी स्वागत केले.