शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सेवा सुधारली, तरच निधी द्या

By admin | Updated: February 19, 2016 01:36 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला गेल्या काही वर्षांत हजारो कोटींचा निधी व संचलन तुटीचे १३२ कोटी रुपये दिले आहेत़; परंतु त्यातून बससेवेत सुधार व प्रवासी संख्येत वाढ न होता,

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला गेल्या काही वर्षांत हजारो कोटींचा निधी व संचलन तुटीचे १३२ कोटी रुपये दिले आहेत़; परंतु त्यातून बससेवेत सुधार व प्रवासी संख्येत वाढ न होता,घसरणच सुरु आहे़ बस सेवासुधार व प्रवासी संख्येत वाढ होईल, या अटीवरच पीएमपीला निधी द्यावा, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाने केली आहे़आजवर दिलेला निधी हा प्रामुख्याने ठेकेदार, पीएमपी अधिकारी, सेवक यांनाच वाटप करण्यात आला़ महापालिकेने पुन्हा नुकतेच ९० कोटी रुपये दिले आहेत़ ही गोष्ट चांगली आहे़ हा सर्व निधी बससेवा सुधार व सातत्याने बस प्रवासीवाढीसाठी असू शकतो़; परंतु निधी फक्त राजकीय हेतूने व संबंधितांच्या ‘बंद आंदोलन’ या दबावतंत्रामुळे कुठल्याही अटी न घालता दिला गेला आहे़ इतका मोठा निधी देऊनही सेवा व प्रवासी संख्या सुधारण्याऐवजी त्यात घसरण होत आहे़ सादरीकरणातून मिळविलेला स्मार्ट सिटी निवडीचा दर्जा बकाल सिटीकडे वाटचाल करायची नसेल, तर सातत्याने बसप्रवासी वाढीशिवाय पर्याय नसल्याचे जुगल राठी यांनी सांगितले़पीएमपीच्या ताफ्यात २०१० मध्ये १५८६ बसगाड्या होत्या़ त्यांचा वापर हा ७६ टक्के होतो़ त्यातून ११़५९ लाख दैनिक प्रवासी प्रवास करीत होते़ २०१५ मध्ये बसचा ताफा २०९४ पर्यंत पोहोचला; पण या ताफ्याचा वापर ६३ टक्क्यांवर येऊन दैनिक प्रवाशांची संख्या १०़८५ लाखांपर्यंत खाली आली आहे़ बससेवेत ही घसरण चालू आहे़ बंद पडणाऱ्या, नादुरुस्त बसगाड्या, बसची दुरवस्था, अस्वच्छ बस, अपघात, सेवक वर्तन, वेळापत्रकाचा व वक्तशीरपणाचा अभाव, बसस्थानक, थांबा दुरवस्था, स्वच्छतागृह, पाणी, सुरक्षिता अशा अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते़ इंधनाचे दर कमी झाले असतानाही बसभाड्यात नियमित वाढ होत आहे़