शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

20 दिवस रोजगार द्या

By admin | Updated: March 25, 2017 03:25 IST

सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

कोरेगाव भीमा : सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनच सादर केले आहे.याबाबत पाचंगे यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पत्नीसह त्याच्याच शेतात काम करण्यासाठी महिन्यातील २० दिवस मनरेगा-रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने पगार देणे गरजेचे आहे. यामुळे त्या कुटुंबाला महिन्याला १० ते १२ हजार रुपये हमखास उत्पन्न मिळणार आहे. त्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्याला पिवळे रेशनिंग कार्ड देण्यात यावे. कुठलेही कर्ज दिल्यानंतर त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवू नये, शेतीच्या कर्जासाठी त्या शेतीचे मूल्यमापन बिगरशेती (एनए) प्रमाणे ठरविण्यात यावे, शेतजमिनीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तालुक्यात गोडावून व शीतगृहे उभी करावी व ती शेतकऱ्यांना नाममात्र भाड्याने वापरण्यास द्यावी, असे पर्यायही पाचंगे यांनी निवेदनात दिले आहेत. खासगी सावकारांची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)