शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

20 दिवस रोजगार द्या

By admin | Updated: March 25, 2017 03:25 IST

सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

कोरेगाव भीमा : सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनच सादर केले आहे.याबाबत पाचंगे यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पत्नीसह त्याच्याच शेतात काम करण्यासाठी महिन्यातील २० दिवस मनरेगा-रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने पगार देणे गरजेचे आहे. यामुळे त्या कुटुंबाला महिन्याला १० ते १२ हजार रुपये हमखास उत्पन्न मिळणार आहे. त्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्याला पिवळे रेशनिंग कार्ड देण्यात यावे. कुठलेही कर्ज दिल्यानंतर त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवू नये, शेतीच्या कर्जासाठी त्या शेतीचे मूल्यमापन बिगरशेती (एनए) प्रमाणे ठरविण्यात यावे, शेतजमिनीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तालुक्यात गोडावून व शीतगृहे उभी करावी व ती शेतकऱ्यांना नाममात्र भाड्याने वापरण्यास द्यावी, असे पर्यायही पाचंगे यांनी निवेदनात दिले आहेत. खासगी सावकारांची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)