शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

खरिपातील पिकांना किडीपासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुरेसा पाऊस, पोषक हवामान यामुळे राज्याच्या सर्व भागांत खरिपातील पिकांना चांगली वाढ आहे. पिकांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुरेसा पाऊस, पोषक हवामान यामुळे राज्याच्या सर्व भागांत खरिपातील पिकांना चांगली वाढ आहे. पिकांवर आता वेगवेगळी किड पसरण्याचा धोका असून त्यातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्याच्या सर्व भागांत यंदा चांगला पाऊस झाला आहे. पेरलेली सर्व पिके आता वाढीच्या अवस्थेत आली आहेत. नेमक्या अशाच वेळी पिकांवर रोग पडण्याचा धोका असतो. त्यासाठी आधीपासूनच काळजी घ्यावी लागते. प्रामुख्याने पिकांची नियमीत पाहणी करणे गरजेचे असते.

सध्या भात फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिक फुलोरा, शेंगा धरणे ते पक्वतेला आले आहेत. मूग व उडीदाला शेंगा धरायला लागल्या आहेत. बरेच आधी पेरलेले उडीद काढणीलाही आले आहे.

कापसाने फुलोरा धरला आहे. पाणी वेळेवर मिळत असलेला बागायती कापूस बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. भुईमूगालाही चांगला फुलोरा दिसायला लागला आहे. ज्वारी व बाजरीची कणसे आता भरू लागली आहेत. मका, सुर्यफुल, तीळ व कारळे ही पिके वाढीला आहेत.

एकूण पिक क्षेत्राच्या तुलनेत किडीचे प्रमाण कमी आहे, मात्र त्याकडे लक्ष दिले नाही तर संपूर्ण पीक खराब होण्याचा धोका असतो असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

लष्करी अळी, मावा तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, पांढरी माशी, सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, उंट अळी, तंबाखूवर पाने खाणारी अळी, भातावर पिवळी खोडकिड, हुमणी किडीचा,तांबेरा असे रोग वेगवेगळ्या पिकांवर पडत असतात.

किडरोग व्यवस्थापनासाठी क्षेत्रिय स्तरावर शेतीशाळा, कृषि विद्यापीठांकडील पिक संरक्षण विभाग यांच्याकडून शेतकर्यांना विनामूल्य सल्ला देण्यात येतो. तसेच तालुका क्रुषी विभागाकडून फेरोमेन सापळे, ल्युर्सस यांचा ( दिवे लागणारे, आवाज करणारे सापळे) पुरवठा तसेच जैविक किटकनाशकांच्या वापराबाबतही कृषी विभागाकडून शेतकर्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे अशी कृषी विभागातून देण्यात आली.

* खरीप पिकांचे राज्यातील क्षेत्र (ऊस वगळून) १४१.९८ लाख हेक्टर

* पेरणी झालेले क्षेत्र १४१.४६ लाख हेक्टर