शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मसाला पिकातून आणली शेतीत समृद्धी

By admin | Updated: October 24, 2016 01:13 IST

थील एका पदवीधर युवकाने आपल्या गावातीलच रांजणगावच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामवंत देशी व परदेशी कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही

संजय देशमुख, रांजणगाव गणपतीथील एका पदवीधर युवकाने आपल्या गावातीलच रांजणगावच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामवंत देशी व परदेशी कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पिके सोडून आधुनिक तत्रंज्ञानाच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग केले. आल्याचे मसाला पीक घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने शेती समृद्ध केली आहे. महेंद्र नामदेव साळुंके असे या हरहुन्नरी युवा शेतकऱ्याचे नाव असून, आपल्या पदवी शिक्षणाची किंचितही लाज न बाळगता त्यांनी पुणे-नगर महामार्गाला लागूनच असलेल्या आपल्या ३० गुंठे क्षेत्रात मसाला पिकात गणना होणाऱ्या आल्याचे पीक घेऊन परिसरात एक आगळेवेगळे पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यासाठी त्यांना आई मंदाबाई तसेच मित्र परिवाराचीही उत्तम साथ लाभली. नारायणगाव येथून स्थानिक जातीचे ४०० किलो आल्याचे खात्रीशीर निरोगी व रसरशीत बेणे विकत आणले. साधारणपणे महिना ते दीड महिनाभर हे बेणे जमिनीवर सावलीत ढीग करून ठेवले व त्यावर बारदानाने आच्छादन केले. नंतर दररोज पाणी शिंपडून बारदान ओले राहील, याची दक्षता घेतली. दरम्यानच्या काळात आले पिकाला मध्यम प्रतीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व भुसभुशीत जमीन आवश्यक असल्याने जमीन चांगली खोलवर नांगरून, कुळवून भुसभशीत केली. त्यात ६ ट्रॉली शेणखत टाकून चार फुटांवर सरी पाडली. लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व पालाशयुक्त वरखते दिली. वरंब्यावर २० सें.मी. अंतरावर ढीग करून ठेवलेल्या आल्याच्या बेण्यातून क ोंब आलेले २ ते ३ डोळे असलेल्या कंदाचे २५ ग्रॅम वजनाचे तुकडे करून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यात आली. लागवडीपूर्वी रोग व किडीपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी कंदाचे तुकडे बुरशीनाशकात बुडवून घेतले. पिकाला पाणी तसेच प्रवाही द्रवरूप खते देण्यासाठी वरंब्यावर ठिबक सिंचन संचाची व्यवस्था केली. पीक महिन्याचे झाल्यावर हलकीशी खुरपणी करून तण काढले. नंतर ४ महिन्यांनी तण काढून कंदाला मातीची भर दिली. साधारणपणे चांगला बाजारभाव असल्यास ६ महिन्यांनंतर आल्याचे पीक काढता येते; मात्र बाजारभाव नसल्यास ते पीक तसेच जमिनीत ठेवल्यास कंद पोसून उत्पन्नात भर पडते. आल्यापासून सुंठ तयार करण्याबरोबरच दररोजच्या आहारात, मसाला पदार्थ, औषधे, आलेपाक तसेच संस्करण प्रक्रिया उद्योगात आल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.