शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

टँकरचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील

By admin | Updated: April 24, 2017 04:31 IST

वेल्हे तालुक्यातील टँकर मागणीचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील आणि पाणी व विकासाच्या बाबतीत राजकारण करू नका

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील टँकर मागणीचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील आणि पाणी व विकासाच्या बाबतीत राजकारण करू नका, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी वेल्हे येथे केले. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती वेल्हे आणि कृषी विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने वेल्हे पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम आढावा बैठक व पाणीटंचाई उपाययोजना सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यानवेळी देवकाते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, पंचायत समिती सदस्य संगीता जेधे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, माजी सभापती चतुरा नगिने, पंचायत समिती कृषी अधिकारी उत्तम साखरे आदींसह कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.देवकाते म्हणाले, ‘‘वेल्हे तालुक्यातील टँकरचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील. यासाठी पंचायत समितीमध्ये टंचाई कक्ष स्वतंत्र तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांना देण्यात आल्या आहेत. वेल्हे तालुक्यातून १० गावांनी टँकरची मागणी केली असल्याचे गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी या वेळी सांगितले. हे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडून ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत. त्या ठिकाणी ते ताबडतोब मंजूर करण्याची जबाबदारी आमची राहील, असेही देवकाते यांनी या वेळी सांगितले.मागील वर्षी १९ मे रोजी टँकर सुरू करण्यात आला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. परंतु, या वेळी लवकरात लवकर टँकर सुरू करावेत, अशी मागणी सभापती सीमा राऊत यांनी केली. जिल्ह्यातून वेल्हे तालुक्यातून सर्वाधिक भाताचे बीज तयार होते. तालुक्यातील १८० शेतकऱ्यांनी २,००० क्विंटल बियाणे महाबीजला देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ प्रभारी जिल्हा व्यवस्थापक फाटे यांनी दिली. तर, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी खरेदी केल्याची पावती व बॅग जपून ठेवावी. जर बियाणे निकृष्ट लागले, तर कारवाई करणे सोपे जाईल, अशी माहीती दिली. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी शिवकालीन टाकीसाठी वेल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी केली. त्यामुळे वेल्हे टँकरमुक्त होईल. कृषी अधिकारी उत्तम साखरे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनावणे यांनी आभार मानले.(वार्ताहर)