शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यांच्याबाबत योग्य तो तपास करून रीतसर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

गृहमंत्री देशमुख यांनी येरवडा कारागृहाला शुक्रवारी (दि. १) भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, शरद खटावकर, तसेच कारागृह अधीक्षक यू. टी. पवार उपस्थित होते. त्यानंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील सर्व कारागृहात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कारागृह प्रशासनाने चांगले काम केले. कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या अधिक आहे. कारागृहातील कैद्यांना तात्पुरता जामीन दिल्यास कारागृहातील कैद्यांची संख्या कमी होईल, असा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार ११ हजार कैद्यांना करोनाच्या संसर्ग काळात तात्पुरते जामीन दिल्याचे त्यांनी सांगितले.

कारागृहातील कैदी कुशल कारागीर आहेत. विविध वस्तू ते तयार करतात. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी विक्री दालन सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडे मोकळी जागा उपलब्ध आहे. राज्यातील कारागृहांची क्षमता २२ हजार कैदी असताना प्रत्यक्षात ३८ हजार कैदी कारागृहात आहेत. पाश्चात्य देशाप्रमाणे महाराष्ट्रात आधुनिक कारागृह बांधण्याचा तसेच राज्यातील पोलिसांना निवासस्थाने देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. दोन्ही प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. पोलिसांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे, असेही देशमुख म्हणाले.

--

चौकट

दुकान बंद होऊ नये हेच फडणवीसांच्या टीकेमागचे कारण

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपणाची जबाबदारी असल्याने ते आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणार आहेत. परंतु फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण टीका करण्यापाठीमागे त्यांचे दुकान बंद होऊ नये हेच कारण आहे. म्हणून ते आमच्यावर टीका करत असतात, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

फोटो : येरवडा कारागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री अनिल देशमुख.