शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावची भगतवाडी, माळीणची पसारवाडी, असाणे, पोखरीची बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावची भगतवाडी, माळीणची पसारवाडी, असाणे, पोखरीची बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी ही गावे धोकादायक गावे म्हणून जाहीर झाली असून, या गावांना भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माळीण येथील घटना घडल्यानंतर ही गावे अतिसंवेदनशील झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्येही दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे यांसारख्या घटना घडू लागल्या आहेत. या धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिले आहेत.

आपत्ती निवारण कायदा २००५ या कायद्याअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे भविष्यात पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने ३० जुलै रोजी तहसील कार्यालय आंबेगाव येथे बैठक पार पडली. यावेळी आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत संबंधित गावांकडे उपलब्ध असणाऱ्या जागा मालकांचे संमतीपत्र सादर करावे व ग्रामपंचायतीकडे घरांच्या नोंदी असलेले ८ अ उतारे सादर करण्याविषयी तहसीलदार रमा जोशी यांनी सूचना दिल्या आहेत.

महाड येथील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा समोर आला. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रांताधिकारी, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी धोकादायक गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लगेचच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागाचा दौरा करून धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने ता. ३० जुलै रोजी तहसील कार्यालय आंबेगाव येथे धोकादायक गावचे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार रमा जोशी, नायब तहसीलदार अनंत गवारी, सुनील रोकडे, संबंधित गावचे ग्रामस्थ, ग्रामसेवक इ. उपस्थित होते. बैठकीमध्ये धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांनी सुचविलेल्या जागांचे जागा मालकांचे संमतीपत्र ता.४ ऑगस्ट पर्यंत प्रशासनास सादर करावे व ज्या घरांचे पुनर्वसन करावयाचे आहे, त्या घरांच्या ग्रामपंचायतील नोंदी असल्याचे उतारे सादर करण्याविषयी ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर संबंधित जागेत पुनर्वसन करण्याविषयी ग्रामसभेचे ठराव, लोकसंख्येचे दाखले, मागणी इतिवृतांत सादर करण्याविषयी ही सांगण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी तहसील कार्यालय येथे बैठक पार पडली. बैठकीत जागा मालकांचे संमतीपत्र सादर करण्याविषयी तहसीलदार रमा जोशी यांनी सूचना दिल्या आहेत.

छायाचित्र-कांताराम भवारी