शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावची भगतवाडी, माळीणची पसारवाडी, असाणे, पोखरीची बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावची भगतवाडी, माळीणची पसारवाडी, असाणे, पोखरीची बेंढारवाडी तसेच जांभोरी गावची काळवाडी ही गावे धोकादायक गावे म्हणून जाहीर झाली असून, या गावांना भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माळीण येथील घटना घडल्यानंतर ही गावे अतिसंवेदनशील झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्येही दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे यांसारख्या घटना घडू लागल्या आहेत. या धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिले आहेत.

आपत्ती निवारण कायदा २००५ या कायद्याअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे भविष्यात पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने ३० जुलै रोजी तहसील कार्यालय आंबेगाव येथे बैठक पार पडली. यावेळी आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाबाबत संबंधित गावांकडे उपलब्ध असणाऱ्या जागा मालकांचे संमतीपत्र सादर करावे व ग्रामपंचायतीकडे घरांच्या नोंदी असलेले ८ अ उतारे सादर करण्याविषयी तहसीलदार रमा जोशी यांनी सूचना दिल्या आहेत.

महाड येथील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा समोर आला. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रांताधिकारी, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी धोकादायक गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लगेचच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागाचा दौरा करून धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने ता. ३० जुलै रोजी तहसील कार्यालय आंबेगाव येथे धोकादायक गावचे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार रमा जोशी, नायब तहसीलदार अनंत गवारी, सुनील रोकडे, संबंधित गावचे ग्रामस्थ, ग्रामसेवक इ. उपस्थित होते. बैठकीमध्ये धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांनी सुचविलेल्या जागांचे जागा मालकांचे संमतीपत्र ता.४ ऑगस्ट पर्यंत प्रशासनास सादर करावे व ज्या घरांचे पुनर्वसन करावयाचे आहे, त्या घरांच्या ग्रामपंचायतील नोंदी असल्याचे उतारे सादर करण्याविषयी ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर संबंधित जागेत पुनर्वसन करण्याविषयी ग्रामसभेचे ठराव, लोकसंख्येचे दाखले, मागणी इतिवृतांत सादर करण्याविषयी ही सांगण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी तहसील कार्यालय येथे बैठक पार पडली. बैठकीत जागा मालकांचे संमतीपत्र सादर करण्याविषयी तहसीलदार रमा जोशी यांनी सूचना दिल्या आहेत.

छायाचित्र-कांताराम भवारी