शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सह्याद्रीच्या निसर्गाचे संवर्धन आवश्यक

By admin | Updated: March 26, 2017 01:53 IST

सुसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या भारत देशात विपुल प्रमाणात वनस्पती, प्राणी आहेत. मात्र, देशात नैसर्गिक

पिंपरी : सुसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या भारत देशात विपुल प्रमाणात वनस्पती, प्राणी आहेत. मात्र, देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. प्राणी, वनस्पती नष्ट होण्यामागची कारणे म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट आणि विकासासाठी वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर वापर हे आहे. दख्खनचे पठार, कोकण किनारा असो किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगा या जैवविविधतेने नटलेल्या निसर्गाचे संर्वधन होणे गरजेचे आहे, असे मत पुणे विभागीय वन अधिकारी शिवाजीराव फटांगरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डीच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यात तीन दिवसीय विद्यापीठस्तर जैवविविधता शिबिर आयोजित केले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी फटांगरे बोलत होते. अहमदनगर, नाशिक,पुणे विभागातील १०५ विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होेते. फटांगरे म्हणाले की, वन, तसेच वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी वने आरक्षित केली आहेत. वन विभाग आदिवासींवर गदा आणण्यासाठी नाही. १९९२ मध्ये शासनाने ग्रामीण लोकांच्या सहभागातून वन विकास संकल्पना राबवली. हरितसेना संकल्पनेत विद्यार्थी, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे.कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.डी.पाटील यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. आयोजन प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.विद्यापीठाचे मानववंशशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम गंभीर, विभागीय वन अधिकारी फटांगरे, वनपाल तुषार ढमढेरे, वन निरीक्षक अधिकारी श्रीशैल पाटील, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील उपस्थित होेते. विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, प्रा.गणेश फुंदे, स्टाफ सेक्रटरी प्रा. शरद बोडके, प्रा. अर्चना ठुबे, प्रा. मीनल भोसले, प्रा. अंजली अकीवटे आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)राज्याचे मानचिन्ह असणारा प्राणी शेकरू, राज्याचे निसर्ग मानचिन्ह असणारे फुलपाखरू ब्युमॉरमॉन, चिमुकल्या मधमाशीपासून महाकाय अ‍ॅटलास पतंगापर्यंत आणि झाडापाशी समरूप होणाऱ्या हरणटोळापासून सळसळणाऱ्या फणीनागीपर्यंत सर्वांना सांभाळणाऱ्या या वनांचा परिसर पाहण्याची संधी वन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली. यात नाईट ट्रॅक, तसेच वनभोजनाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर हे पवित्र स्थान पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली.