शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

विरोधाने वाढते कामाची किंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:42 IST

शहराच्या पूर्व भागाला संजीवनी ठरणा-या भामा आसखेड पाणी योजनेचा वाद सुरूच राहणार असला, तरी थांबलेले काम सुरू झाले, हे बरे झाले. सुरुवातीला काही कोटी रुपयांची असलेली ही योजना केवळ विलंबामुळे आता

शहराच्या पूर्व भागाला संजीवनी ठरणा-या भामा आसखेड पाणी योजनेचा वाद सुरूच राहणार असला, तरी थांबलेले काम सुरू झाले, हे बरे झाले. सुरुवातीला काही कोटी रुपयांची असलेली ही योजना केवळ विलंबामुळे आता तब्बल ४२५ कोटी रुपयांची झाली आहे. सन २०१३ मध्ये योजना सुरू झाली. वर्ष-दोनवर्षांत ती पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ती आजही अपूर्ण आहे. विरोधामुळे कामाची दोन वर्षे वाया गेली. त्यात किंमत वाढली, तसा विरोधही वाढला. पाण्याविना लाभार्थी कासावीस झाले, तरीही विरोध शमेना. पैसे तर गुंतलेले, काम थांबलेले व नुसतीच चर्चा चाललेली. काम काही पुढे जायला तयार नाही.नगर रस्त्यावरच्या येरवड्यापासून पुढे नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या महापालिका हद्दीतील सर्व गावांसाठी ही योजना महापालिकेनेच पुढे आणली. या परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे अवघड जाते. पाणी नियमित मिळत नाही, अशा तेथील नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यात तथ्यही होते. त्यावर उपाय म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २० टक्के व महापालिका ३० टक्के याप्रमाणे खर्चाची विभागणी ठरली. त्याप्रमाणे काम सुरू झाले.त्यानंतर मग या योजनेचे दुसरे लाभार्थीही पुढे आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा काही भाग, चाकण एमआयडीसीपासून ते आळंदी नगर परिषद व अन्य काही नगर परिषदांनाही याचा लाभ होणार होता. धरणाच्या ८ टीएमसी पाण्यामधून पुणे महापालिकेला वार्षिक २.६५ टीएमसी पाणीसाठा निश्चित करण्यात आला. तसा करार करण्यात आला. अन्य लाभार्थींनाही कोटा ठरवून देण्यात आला; मात्र त्यांनी काम अजूनही सुरू केलेले नाही.दरम्यानच्या काळात धरणामुळे विस्थापित झालेल्यांचा मुद्दा पुढे आला. एकूण १ हजार ४४२ शेतकरी धरणग्रस्त झाले. त्यांच्या पुनर्वसनाची खरी जबाबदारी राज्य सरकारची, पण त्यांनी फक्त १११ जणांचेच पुनर्वसन केले. उर्वरितांची जबाबदारी त्यांनी योजनेच्या लाभार्थीवर ढकलली. १३१ कोटी रुपयांचे पॅकेज ठरले. पाण्याच्या कोट्याप्रमाणे प्रत्येक लाभार्थीने यातील जबाबदारी उचलायची, असाही निर्णय झाला; पण लाभार्थींपैकी एकट्या महापालिकेचेच काम सुरू होते. त्यामुळेच मग धरणग्रस्तांनी कामाला विरोध करायला सुरुवात झाली. हा एक ‘मोठ्ठा इश्यू’ आहे हे चतूर राजकारण्यांच्या लक्षात आले नसते तरंच नवल!सगळ्या कामाचा विचका होऊ दिला नाही, हे महापालिकेच्या अधिकाºयांचे यशच म्हणायला हवे. धरणाच्या खालून ३५ मीटर अंतरावरून एक बोगदा या योजनेत तयार केला जात आहे. २०० मीटर लांबीचा हा बोगदा तयार करणे कौशल्याचे काम होते. त्याच्या शेवटच्या टप्प्यात आता टॅपिंग (नियंत्रित स्फोट) केले जाणार आहे. त्याशिवाय धरणातून मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. हे सगळेच काम आव्हानात्मक होते.योजनेचे ७० टक्के काम महापालिकेने विरोध, आंदोलने, मोर्चे, काम थांबवणे, न्यायालयात दावे, सरकारी अधिकारी, मंत्री यांच्या बैठका अशा दगदगीतून केले आहे. अनेकदा काम बंद पाडले गेले. थोडी तडजोड झाली की ते पुन्हा सुरू होत असे. काहीजणांना परत विरोधाची उबळ यायची. उर्वरित ३० टक्केच काम राहिले आहे, हे लक्षात आल्यानंतर विरोध आणखी वाढला. धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे, म्हणून ओरड होऊ लागली. काम होणारंच नाही, अशी स्थिती निर्माण केली गेली. ठेकेदार तरी कामगार, यंत्रसामग्री किती काळ उभी ठेवणार?अखेरीस आता यातून मार्ग निघाला आहे. जलवाहिनीच्या ६ किलोमीटर अंतरापैकी ५ किलोमीटर अंतराचे काम करण्यास धरणग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी परवानगी दिली आहे. ते काम लवकरच सुरू होईल. विरोधाने किंमत वाढते ती फक्त कामाचीच नाही, तर पुढारपणा करणाºयांचीही, हेच यातून दिसून आले.- राजू इनामदार